आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रिया:40 हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया, बचतगटाने फुलवली बाग‎

संपत ढोली । सिन्नर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ सरस्वती नदीत सोडलेले सांडपाणी तत्पूर्वीच अडवून नगरपरिषदेने‎ शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे बगीचा तर फुलवलाच, मात्र नदीचे प्रदूषणही‎ काही प्रमाणात कमी करण्यात यश मिळविले आहे. महिला‎ बचतगटाच्या सहाय्याने दररोज ४० हजार लिटर पाण्यावर शुद्धीकरण‎ प्रक्रिया केली जात आहे. असा प्रकल्प राबवणारी सिन्नर नगरपरिषद‎ जिल्ह्यात पहिलीच ठरली आहे.‎

सीइपीटी विद्यापीठाच्या सहाय्याने पुढचे पाऊल म्हणून नदी प्रदूषित‎ होण्यापासून वाचावी याकरिता पथदर्शी प्रकल्प म्हणून नगरपरिषदेने‎ रामनगरी या उपनगरातून वाहून येणारे सांडपाणी ऐश्वर्या गार्डनजवळ‎ ६० हजार लिटर क्षमतेच्या टाकीत अडविले. सद्यस्थितीत रोज ४०‎ हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. मुख्याधिकारी संजय‎ केदार, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता हेमलता दसरे, स्वच्छता‎ निरीक्षक रवींद्र देशमुख, अश्फाक शेख, इच्छापूर्ती महिला‎ बचतगटाच्या सदगीर यांनी त्यासाठी परिश्रम घेतले.‎

अशी चालते प्रक्रिया‎
प्रकल्पात दररोज ४० हजार लिटर‎ सांडपाणी जमा होते. वीज पंपाद्वारे पाणी‎ प्रकल्पात आल्याबरोबर प्रथम ऑइल,‎ ग्रीस, तेलकटपणा काढला जातो.‎ दुसऱ्या साठवण टाकीत पाण्यातील‎ गाळ, खडे, घाण बाजूला केली जाते.‎ हवेच्या दाबाने पाण्याचा वास घालवला‎ जातो. तिसऱ्या टाकीत तयार झालेल्या‎ बॅक्टेरियांमुळे पाणी अधिक शुद्ध होते.‎ हे पाणी वाळूच्या फिल्टरमध्ये सोडून‎ अधिक स्वच्छ केले जाते. अखेरीस‎ क्लोरीन वायू पाण्यात सोडून शुद्ध पाणी‎ उपलब्ध होते. हा प्रकल्प संपूर्णपणे‎ सोलर ऊर्जेवर सुरू आहे.‎

प्रदूषित पाणी नदीत‎ जाण्यापासून रोखले‎
रामनगरी परिसरातील गटारीचे‎ पाणी सरस्वती नदीला‎ सोडलेले होते. या पाण्यावर‎ शुद्धीकरण प्रकल्प बसवल्याने‎ नदीत जाण्यापासून हे प्रदूषित‎ पाणी वाचले आहे. परिणामी‎ सरस्वती नदीचे प्रदूषण काही‎ प्रमाणात रोखण्यास मदत झाली‎ आहे. विशेष म्हणजे शुद्ध‎ झालेल्या पाण्यातून इच्छापूर्ती‎ महिला बचतगटाने दोन‎ महिन्यांपासून ऐश्वर्य गार्डनची‎ देखभाल हाती घेतली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...