आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरू होण्याआधीच काढले पथदीप:पुणे-नाशिक महामार्गावरील‎ सुविधेत शहरी-ग्रामीण भेदभाव‎

संपत ढोली | सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे महामार्गावरील सिन्नर बायपास ते‎ शिंदे टोलनाक्या पर्यंतच्या पुलाजवळील ‎सर्व्हिस मार्गावरची पथदीप व्यवस्था सुरू ‎होण्याआधीच गुंडाळण्यात आली. दोन‎ दिवसांपासून महामार्गावरील पथदीप ‎काढण्यात येत आहेत. दरम्यान, ‎बायपासपासून टोलनाक्यापर्यंत सर्व्हिस ‎रोडवर पथदीप बसवण्याचा करारच ‎सरकारने केला नाही. ही व्यवस्था फक्त शहरी भागासाठी नाशिकरोड जवळच्या‎ दोन पुलांजवळ देण्यात आली आहे.‎

त्यामुळे एकाच प्रकल्पात सुविधा देताना ‎शहरी व ग्रामीण असा भेदभाव झाल्याचे समोर आले आहे.‎ चार वर्षांपूर्वीच बायपासवरील ‎धोंडवीरनगर, मनेगाव, डुबेरे, घोटी‎ महामार्ग, सरदवाडी, चिंचोली, कॉलेज, चिंचोली फाटा येथील पुलांजवळच्या‎ काही सर्व्हिस रोडवर पथदीप‎ व्यवस्थेसाठी वीज खांब उभे करण्यात‎ आले होते. महामार्गावरील पुलांजवळ ‎पथदीप नसल्याने लुटमारीसह गुन्हेगारी ‎स्वरूपाच्या घटना वारंवार घडत आहेत. पथदीप बसवण्याची मागणी होत‎ असतानाच दोन दिवसांपासून सर्व्हिस‎ रोडवरील पथदीपांसाठी उभे केलेले खांब‎ ठेकेदार कंपनीमार्फत काढण्यात आले‎ आहेत.‎‎ ‎

या प्रश्नांकडे ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष‎ बायपाससह टोलनाक्यापर्यंत‎ महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.‎त्याची दुरुस्ती वेळेत होत नाही.‎ पावसाळ्यात सर्वच पुलांखाली पाणी‎ साचते. ते वाहून जाण्यासाठी व्यवस्था‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केली जात नाही. प्रत्येक पुलाजवळ‎ अपघात टाळण्यासाठी आरसे बसविले‎ आहेत. सद्यस्थितीत ते फुटले आहेत.‎

तसा करार झाला नाही‎
पुणे महामार्गावरील खेड ते गुरेवाडीपर्यंत‎ सर्व्हिस रोडवर पथदीप सुविधेचा करार‎ आहे. तसा करार गुरेवाडी ते नाशिक‎ करिता नाही. वीज खांब चोरी जाण्याच्या‎ घटना निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे‎ कंपनी अधिकाऱ्यांनी खांब काढून‎ घेण्यास सांगितले आहे.‎ - हर्षल वाकचौरे, दुरुस्ती विभाग प्रमुख,‎ चेतक कंपनी‎

महामार्गावर‎ भेदभावाचे दोन मुद्दे‎
महामार्गावर नाशिकरोड जवळच्या‎ दोन पुलांजवळ सर्व्हिस रोडवर पथदीप‎ व्यवस्था केली आहे. बायपास ते‎ नाशिक रोड या एकाच टप्प्यातील‎ कामात शहर व ग्रामीण असा भेदभाव‎ झाला आहे.‎खेड ते गुरेवाडी महामार्गावर ग्रामीण‎ भागात सर्वच पुलांजवळील सर्व्हिस‎ मार्गावर पथदीप व्यवस्था करण्यात‎ आली आहे. या टप्प्यात शहर-ग्रामीण‎ असा भेदभाव झाला नाही.‌‎

बातम्या आणखी आहेत...