आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सल्युझिव्ह‎:नाशिकचे 1000 भाविक सहभागी हाेणार‎

सचिन जैन | नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१०८ वा कुंडीय महायज्ञ साेहळा १९ ते २७ नाेव्हेंबर या‎ ‎ दरम्यान वृंदावन येथे हाेणार आहे.‎ ‎ तब्बल ४० एकरवरील या यज्ञात‎ ‎ साेहळ्यात ४ ते ५ लाख भाविक‎ ‎ सहभागी हाेणार असून यात नाशिक‎ ‎ शहर व जिल्ह्यातून एक हजाराहून‎ ‎ अधिक भविक सहभागी हाेतील.‎ साेहळ्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांची वंृदावन येथे‎ निवासासह जेवणाची व्यवस्था करण्यात येणार‎ असल्याचे श्री स्वामी भरतदासाचार्य महाराज यांनी‎ नाशिक दाैऱ्यावर आले असताना स्पष्ट केले.‎ त्यांच्याशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने संवाद साधला.‎

विश्वशांतीसह सनातन धर्माच्या प्रचारासाठी २०‎ डिसेंबर १९७१ राेजी पहिला यज्ञ झाल्याची आख्यायिका‎ आहे. गेल्या ५२ वर्षांत देशातील विविध १०७ शहरात‎ १०७ श्री लक्ष्मीनारायण महायज्ञ करण्यात आले आहे.‎ पुढील महायज्ञ आता वृंदावनला हाेत आहेे.‎

महायज्ञाबाबत समाजात माहिती व्हावी यासाठी स्वामी‎ भरतदासाचार्य यांनी नाशिकचा दाैरा केला. वैदिक‎ विधीच्या माध्यमातून संसारातील प्रत्येक व्यक्ती सुखी‎ व्हावी या उद्देशाने भरतदासाचार्य महाराज यंानी १०८ श्री‎ लक्ष्मीनारायण महायज्ञाचा संकल्प केला हाेता.‎ साेहळ्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देखील‎ आमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील ७५०‎ ब्रह्मवृंद या साेहळ्याचे पाैराेहित्य करतील.‎

एका कुुंडासाठी अशी सामग्री...‎
या यज्ञात १०८ कुंंड असणार आहे. त्यापैकी आहुतीसाठी‎ एका कुंडासाठी ७० किलाे तीळ, ३५ किलाे तांदूळ, १७.५‎ किलाे जवस, ८.७५ किलाे साखऱ ,४.५ िकलाे तूप, ४.५‎ किलाे हवन सामग्रीचा समावेश असणार आहे.‎

२५ व्या‎ वर्षीच केला‎ हाेता‎ पहिला यज्ञ‎
श्री स्वामी भरतदासाचार्य महाराज हे २५ वर्षांचे असताना १९७१ मध्ये मध्य प्रदेशमधील‎ कटनी या ठिकाणी पहिला यज्ञ केला हाेता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मध्य प्रदेश,़राजस्थान‎ , गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हैदराबाद,़ पश्चिम बंगाल,़ आसाम,़‎ हरियाणा अशा राज्यांतील विविध शहरात आतापर्यंत १०७ वे यज्ञ आतापर्यंत‎ यशस्वीपूर्ण केले आहे.‎

२००३ मध्ये नाशिकला हाेता मान‎‎
२००३ मध्ये हा यज्ञ साेहळा नाशिकमध्ये कुंभमेेळा हाेता‎ तेव्हाच पार पडला हाेता. तेव्हाही देशभरातून लाखाेंच्या‎ संख्येने भाविक नाशिकमध्ये आले हाेते. आता‎ नाशिकचे भाविक त्याच उत्साहाने वृंदावनला जातील.‎

बातम्या आणखी आहेत...