आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्यानंतर वाढणारे कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी नाफेडद्वारे सुरू असलेल्या “फार्म गेट’ खरेदीत काही “ऑफलाइन’ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नाफेडचे अधिकारी संगनमताने कोट्यवधींचा घोटाळा करत असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे अाले अाहेत. सदर फेडरेशनने ‘नाफेड’च्या सिस्टिमनुसार काम सुरू असल्याचा दावा केला असून नाफेडच्या अधिकाऱ्यांनी मात्र तपशील देण्यास नकार दिल्याने या कांदा खरेदीभोवतीचे संशयाचे ढग अधिकच दाट झाले आहेत. शेतीमालाचे भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा मिळावा व पडल्यास शेतकऱ्यांना आधार मिळावा या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने दर स्थिरीकरण योजना राबवली जाते.
याअंतर्गत चालू वर्षात कांदा आणि डाळी खरेदी करण्यासाठी २७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी नाफेडद्वारे महाराष्ट्रातून १.५ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून एप्रिलपासून सुरू असलेली ही खरेदी जुलैपर्यंत चालणार आहे. मात्र, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या या खरेदीत पारदर्शकता न बाळगल्याने व्यापाऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांचा कांदा दाखवणे, ठरलेल्या भावापेक्षा कमी किंमत देणे आणि चाळींच्या भाड्यातही अनियमितता करणे असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी अाहेत.
महाराज्य फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश भीमराव पवार संचालक असलेल्या ५ कंपन्या
गोदावरी सुरेश पवार संचालक असलेल्या कंपन्या
गणेश सुरेश पवार संचालक असलेल्या कंपन्या
खरेदीचे गौडबंगाल, फेब्रुवारीत स्थापना, एप्रिलमध्ये काम
“नाफेड’द्वारे सध्या राज्यात महा-एफपीसी फेडरेशन, महाराज्य फेडरेशन आणि पृथाशक्ती फेडरेशन या तीन राज्यस्तरीय फेडरेशनद्वारे कांदा खरेदी सुरू आहे. यापैकी ३०३ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन असलेल्या महा-एफपीसी या फेडरेशनच्या कांदा खरेदीची माहिती “महाअनियन’ या पोर्टलवर उपलब्ध आहे. यंदा मात्र, “नाफेड’च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कांद्याची रिकव्हरी काढून त्यांना फक्त २५ हजार मेट्रिक टन खरेदीचे काम दिले आहे. दुसरीकडे कौटुंबिक फेडरेशन असलेल्या आणि कोणतीही “ऑनलाइन’ माहिती उपलब्ध नसलेल्या महाराज्य फेडरेशनद्वारे तब्बल ७० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी सुरू आहे. अवघ्या १४ कंपन्यांद्वारे सुरू असलेल्या या खरेदीत ठरलेले भाव न देणे, चाळीचे भाडे दडवणे, व्यापाऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांचा कांदा म्हणून वळवणे असे धक्कादायक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी “दिव्य मराठी’कडे केल्या आहेत.
टार्गेट पूर्ण करायचे आहे, अटी-शर्तींची माहिती देऊ शकत नाही.
आम्हाला सर्वांसोबतच काम करायचे आहे, अधिकाधिक टार्गेट पूर्ण करायचे आहे. जे जास्तीत जास्त खरेदी करून देतील त्यांच्यासोबत आम्ही काम करीत आहोत. कोणामार्फत किती व कशी खरेदी करताे त्याच्या अटी-शर्तींची माहिती अाम्ही देऊ शकत नाही. - शैलेंद्रकुमार, पिंपळगाव शाखा व्यवस्थापक, नाफेड
‘नाफेड’च्या सिस्टिमनुसारच आम्ही काम करत आहोत
आमच्या फेडरेशनच्या ५० कंपन्या आहेत. नाशिक, नगर आणि पुण्यातील शेतकऱ्यांकडून आम्ही कांदा खरेदी करत आहोत. नावे सारखी असली तरी कंपन्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अाहेत.‘नाफेड’च्या सिस्टिमनुसारच अाम्ही काम करत आहोत. - सुरेश पवार, संचालक, महाराज्य फेडरेशन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.