आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कालिदास’मध्ये नाट्य:20 हजार भाडे पण एसी न चाले; प्रेक्षकांपुढे‎ कलाकारांवर आली हात जोडण्याची वेळ‎

प्रतिनिधी | नाशिक‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घामाघूम प्रेक्षकांचा संताप; ६० प्रेक्षकांनी पैसे घेतले परत‎

महाकवी कालिदास कलामंदिरात‎ सत्रानुसार भाडे अनामत रक्कम अशा‎ विविध मार्गाने एका प्रयोगासाठी‎ जवळपास २० हजार रुपये भाडे घेतले‎ जाते. सुविधा मात्र शुन्य आहेत. याचा‎ प्रत्यय रविवारी आला. प्रचंड उकाडा‎ वाढलेला असतानाही नाट्यगृहातील‎ एसी दिवसभर बंद असल्याने‎ प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा पारा चढला.‎ अखेर अभिनेते वैभव मांगले यांनी‎ प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर‎ काही प्रेक्षक थांबले तरी तब्बल ६०‎ प्रेक्षकांनी आपल्या तिकिटांचे पैसे परत‎ घेतले. एकिकडे हा गोंधळ सुरू‎ असताना मात्र महाकवी कालिदास‎ कलामंदिराचे व्यवस्थापक,‎ सुपरवायझर किंवा इतर कोणतेही‎ कर्मचारी हजर नव्हते किंवा ते फोनही‎ घेत नसल्याचे येथील नाट्य ठेकेदार‎ आणि काही प्रेक्षकांनी सांगितले. या‎ नाटकाला आलेले ज्येष्ठ नागरिक‎ प्रचंड उकाड्याने मात्र हैराण झाले हाेते.‎ यावर आम्ही अधिकाऱ्यांशी संवाद‎ साधला असता केवळ ‘माहिती घेतो’‎ असे उत्तर मिळाले.‎ महाकवी कालिदास कलामंदिराच्या‎ नुतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च‎ करुनही हा खर्च केवळ वरवरच‎ केल्याचे आता दिसून येते आहे. ‎ ‎ वातावरणात प्रचंड बदल झाल्याने‎ उष्णतेचा पारा ४० पर्यंत पोहोचला‎ असताना नाट्यगृहातील एसी रविवारी‎ (दि. १४) सकाळपासूनच बंद पडला‎ होता.

येथे प्रचंड उकडत असल्याने‎ प्रेक्षक घामाघूम झाले होते.‎ अनेक प्रेक्षकांनी निघून जाण्याचा‎ निर्णय घेतला. त्यावेळी अखेरीस‎ मध्यंतरात नाटकातील अभिनेते‎ वैभव मांगले यांनी प्रेक्षकांना‎ विनंती केली, आम्ही मुंबईहून‎ नाटक घेऊन आलो आहोत.‎ संपूर्ण संच आहे. एसीचे आधी‎ माहिती असते तर प्रयोगच केला‎ नसता. मात्र आता कलेवरच्या‎ आणि कलाकारांच्या प्रेमापोटी‎ आपण नाटकाला थांबले‎ आहात, मात्र यानंतर आपण‎ तिकिट काढताना एसी आहे का‎ असे विचारा. असा संवाद त्यांनी‎ साधल्यावर प्रेक्षक थांबले.‎ तरीही तब्बल ६० प्रेक्षकांनी‎ आपले तिकिटाचे पैसे परत‎ नेल्याचे नाट्यसेवाचे राजेंद्र‎ जाधव यांनी सांगितले.‎

‎ नाटकाचे दरही किमान ५०० रुपये असतात.‎ ‎ नाशिकमध्ये हे एकमेव नाट्यगृह आहे. तीथे‎ ‎ जर महापालिका सुविधा देत नसेल तर‎ ‎ नाटकवाल्यांकडून एवढे भाडे कशाचे घेतात?‎ ‎याठिकाणी कोणत्याच सोयी नाही. उन्हाळ्याचे‎ ‎ दिवस आहेत. ज्येष्ठ नागरिकांचाही विचार‎ करत नाहीत . - निहाल वाघ, नाट्यरसिक

याला जबाबदार कोण, ऐकून घ्यायला एक अधिकारी नाही...‎

कोणत्याही थिएटरमध्ये‎ ‎व्हेंटीलेशन नसते.‎ ‎एसीशिवाय प्रयाेगच‎‎ लावता येत नाही. एसी जर‎‎ बंद आहे तर सांगायला‎ नको का? ती बेसीक गरज‎ आहे. अखेरीस प्रेक्षक हवालदिल झाले‎ आणि उठून जायला लागले. आम्ही तर‎ स्टेजवर घामाघूम झालो होतो. अशा‎ सगळ्यात प्रेक्षकही अस्वाद घेऊ शकत नाही.‎ या ठिकाणी तक्रार ऐकून घ्यायला पालिकेचा‎ एकही अधिकारी नव्हता हे आणखीच दुर्दैव.‎ अखेरीस प्रेक्षक मायबाप असतात. त्यांना‎ विनंती केल्यावर ते थांबले. यामुळे मात्र‎ आम्ही आमच्या पुढील तारखा रद्द केल्या‎ आहेत. - वैभव मांगले, अभिनेते‎

याबाबत तत्काळ माहिती घेण्यात येईल‎

महाकवी कालिदास कलामंदिरातील एसी बंद‎ ‎ पडल्याची माझ्याकडे कोणतीही माहिती नाही.‎ ‎ याबाबत तत्काळ माहिती घेताे आणि एसी‎ ‎ दुरुस्ती असेल किंवा अन्य काही कारणाने एसी‎ ‎ बंद पडला असेल त्यावर त्वरीत काम करण्यात‎ ‎ येईल. - मनाेज घाेडे- पाटील, उपायुक्त,‎ नाशिक महापालिका‎