आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेकडून लेटरबाॅम्ब:28 दिवस, 61 वेळा बत्तीगुल;‎ पाणीबाणी महावितरणमुळेच‎

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ शहरातील २० लाख लाेकसंख्येच्या ताेंडचे पाणी‎ पळवण्याचे प्रकार वारंवार घडत असून याबाबत‎ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हाेणारी‎ टीका माेडीत काढण्यासाठी थेट महावितरणला पत्र‎ पाठवून त्यांचा कारभार उघड करण्यात आला‎ आहे. फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसांत जवळपास ६१‎ वेळा अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे‎ पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. धरणातून‎ जलकुंभापर्यंत तर जलकुंभाचा वीजपुरवठा खंडित‎ झाल्यास तळापर्यंत पाणी पाेहाेचत नसल्यामुळे‎ पालिकेने अचानक वीजपुरवठा खंडित करू नये,‎ किमान कळवण्याची तसदी घ्यावी, असा‎ विनंतीवजा इशाराही दिला आहे.‎ गेल्या काही महिन्यांत नाशिक शहरातील‎ पाणीपुरवठा अचानक विस्कळीत हाेत आहे.‎ सिडकाेसारख्या भागात तर दाेन-दाेन दिवस पाणी‎ येत नसल्याचे प्रकार घडले आहे. बऱ्याचवेळा‎ पाणीपुरवठा विस्कळीत हाेण्यामागे जुन्या‎ जलवाहिन्या कारणीभूत ठरतात.

त्यामुळे आधीच‎ मनपाला नागरिकांचा राेष सहन करावा लागत आहे.‎ अशातच, आता, महावितरणमुळे वीजपुरवठा‎ खंडित हाेण्याचे प्रकार वाढले आहे. महापालिकेचे‎ गंगापूर, मुकणे, दारणातील चेहेडी धरणासह पाच‎ ठिकाणी पंपिंग स्टेशन आहे. याव्यतिरिक्त सहा‎ ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे. धरणातून पंपिंग‎ स्टेशनद्वारे जलकुंभ तर जलकुंभावरून पाणीपुरवठा‎ नागरिकांपर्यत केला जाताे. नेमक्या याच ठिकाणी‎ वीजपुरवठा अचानक खंडित झाला तर पाणी‎ वितरण ठप्प हाेते. फेब्रुवारी महिन्यात गत २८‎ दिवसात ६१ वेळा वीजपुरवठा अचानक खंडित‎ झाला. त्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्यात अडचण‎ आली.‎

पालिकेने दिलेल्या पत्राचा असा आहे आशय...‎
गंगापूर धरण, चेहेडी पंपिंग, मुकणे‎ धरण, गोपाळनगर व बोरगड या‎ ठिकाणी पंपिंग स्टेशन्स आहेत.‎ तसेच बाराबंगला, शिवाजीनगर,‎ विल्होळी, नाशिकरोड, गांधीनगर,‎ निलगिरी बाग या सहा ठिकाणी‎ जलशुद्धीकरण केंद्र आहेत. या‎ केंदांवर महावितरण कंपनीकडून‎ सबस्टेशनद्वारे ३३ व ११ केव्ही‎ एक्सप्रेस फीडरवरून वीजपुरवठा‎ केला जातो. फेब्रुवारी महिन्यात‎ मनपाच्या विविध पंपिंग स्टेशन व‎ जलशुद्धीकरण केंद्र येथे वीजपुरवठा‎ खंडित होत असून त्याबाबत‎ जलशुद्धीकरण केंद्रास कुठलीही‎ पूर्वसूचना महावितरण कंपनीकडून‎ दिली जात नाही. परिणामी संबंधित‎ केंद्रांवरून होणारा पाणीपुरवठा‎ वारंवार विस्कळीत हाेत आहे.‎ वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत‎ असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत‎ होऊन मशिनरी वारंवार चालू बंद‎ होत असल्याने मशिनरीच्या‎ कार्यक्षमतेवर देखील परिणाम होऊन‎ मशिनरी व उपकरणांचे नुकसान होत‎ आहे.‎

अचानक वीजपुरवठा‎ खंडित करू नये‎
फेब्रुवारी‎ महिन्यात पंपिंग‎ स्टेशन व‎ जलशुद्धीकरण‎ ‎केंद्र मिळून ६१‎ वेळा‎ वीजपुरवठा खंडित झाला आहे.‎ पूर्वसूचना दिल्यास स्वतंत्र व्यवस्था‎ करता येऊ शकेल. - अविनाश‎ धनाईत, कार्यकारी अभियंता,‎ पाणी पुरवठा‎

बातम्या आणखी आहेत...