आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अंतरिम निकाल लागून अनेक दिवस उलटले असूनही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आता अंतिम निकाल व शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे.
गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम जाहीर होऊन अनेक दिवस उलटले आहे. अंतरिम निकाल जाहीर झाला असून त्यात पाचवीचे २३.९० टक्के तर आठवीचे १२.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून ४ लाख १८ हजार ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ८२ हजार ६९७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ राहिले होते. त्यापैकी ९१ हजार ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ३ हजार ८०९ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ७९ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात पाचवीसाठी २० हजार ९२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९,४४५ विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तर आठवीसाठी १७, ५६४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ४०३ हजर हाेते.
१२ फेब्रुवारी २०२३ ला परीक्षा, १५ डिसेंबरपर्यंत
परीक्षा परिषदेतर्फे १२ फेब्रुवारी २०२३ ला शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकाचवेळी राज्यभरातील केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.