आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून शासनाकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जातो. त्यासाठी महाविद्यालयांकडून अर्ज मंजूर होऊन ते समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे ऑनलाइनच सादर केले जात असून गत ३५ दिवसांत राज्यातील विविध महाविद्यालयांकडून तब्बल ५० हजार अर्ज समाजकल्याण विभागाकडे सादर केले आहे. परंतू अद्यापही ७५ हजार अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे.
यात नाशिकमधील ३६०० ्अर्जांचा समावेश असून ते संबंधित संस्थांनी अद्यापही सबमीट केले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांन शिष्यवृत्तीसाठी अडचण हाेऊ शकते. इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर आणि पीएच.डी.सह इतर तसेच सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासनाकडून एस.सी. अोबीसी आणि आर्थिक दुर्बल या घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना लागू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज सादर केले जातात. ते अर्ज महाविद्यालयांच्या मंजूरीनंतर समाजकल्याण विभागाच्या डेस्कला येतात.
समाजकल्याण विभागाकडून अर्ज मंजूर होऊन िवद्यार्थ्यांच्या थेट खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. परंतू गत काही वर्षांपासून महाविद्यालयांकडून हे अर्ज मंजूरीचे काम अपेक्षेनुसार होत नाही. नाशिकमध्ये एकूण १६ हजार नोंदणी झाली आहे. ६ मार्चपर्यंत समाजकल्याणने ११ हजार १२७ अर्ज निकाली काढले. १ हजार अर्ज विद्यार्थ्यांच्या लाॅगीनला असून, ३६०० अर्ज महाविद्यालयांकडेच आहेत. तर ५०० अर्ज समाजकल्याणकडे आहे. सहायय्क आयुक्त समाजकल्याण यांनी सर्व महाविद्यालयांनी त्वरित अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.