आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘स्वच्छ भारत, हरित भारत’ असा संदेश देत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सात सदस्य सहा हजार किलाेमीटरच्या प्रवासास निघाले आहेत. उद्या साेमवारी प्रवास पूर्ण हाेईल. चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, रमेश धोत्रे, अनिल वराडे, मोहन देसाई, संजय कुलकर्णी यांनी मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली व परत मुंबई असा प्रवास करून ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ हे अभियान घेऊन १७ फेब्रुवारी राेजी गेट वे ऑफ इंडिया येथून प्रवासाला सुरुवात केली.
दिल्ली येथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांना उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. दिल्ली येथे महाराष्ट्र परिचय केंद्रासदेखील भेट देऊन सायकलिस्टने मोहिमेची माहिती दिली. जयपूर, अजमेर, उदयपूर,ब डोदा यामार्गे साेमवारी ( दि. ६) गेट वे ऑफ इंडिया येथे हा प्रवास पूर्ण हाेईल. संपूर्ण प्रवासात ठिकाणी सायकलिस्टने लोकांशी संवाद साधला व ‘स्वच्छ भारि, हरित भारत’ या अभियानाची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.