आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्ल्युझिव्ह:अपुऱ्या मुनष्यबळामुळे विवाह नोंदणी प्रक्रियेत 60 टक्के घट‎

जहीर शेख | नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह नोंदणी कार्यालयात अपुरे‎ मनुष्यबळामुळे व कामाच्या अतिरिक्त‎ ताणामुळे विवाह नाेंदणीची प्रक्रिया संथ गतीने‎ हाेत आहे. याबराेबरच ही नाेंदणी प्रक्रिया‎ किचकट असल्यामुळे विवाह सोहळ्यानंतर‎ विवाह नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात‎ चकरा मारण्याची वेळ नवविवाहितांवर‎ ओढवत आहे. ही कार्यालये गतिमान व‎ संगणकीकृत करण्यासाठी महापालिकेकडून‎ प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात‎ असले तरी ही प्रक्रिया कागदावरच राहिल्याने‎ नोंदणीचे प्रमाण ६० टक्क्यांनी घसरले आहे.‎ काेविडच्या आधी २०१९ मध्ये दर महिन्याला‎ पालिकेच्या सहा विभागात एकूण ४५० विवाह‎ नाेंदणी हाेत असे, मात्र सध्या संथ‎ कामकाजामुळे ही नाेंदणी घसरून महिन्याला‎ १८० इतकी हाेत आहे.‎

महापालिकेच्या सहा विभागीय‎ कार्यालयांत विवाह नोंदणी कार्यालये आहेत.‎ येथील कामकाज पेपरलेस पद्धतीने‎ करण्यासाठी संगणकीकरणाची योजना‎ महापालिकेकडून आखली जात आहे.‎ त्यासाठी पाच वर्षांपूर्वी लाखो रुपयांची‎ संगणक खरेदीही करण्यात आली. परंतु, या‎ कार्यालयांच्या संगणकीकरणाला अद्याप‎ मुहूर्तच लागलेला नाही. खरेदी केलेले‎ संगणक, थम्ब मशिन, वेब कॅमेरा असे‎ साहित्य देखिल इतर कामांसाठी वापरण्यात आले आहे.

संगणकीकरणावर भर‎
‎लग्नानंतर‎ ‎ विवाह नोंदणी‎ ‎ करणे आवश्यक‎ ‎ असून, त्याची‎ ‎ रीतसर कायदेशीर‎ ‎ नोंद घेतली जाते.‎ ‎ सध्या ही नोंदणी‎ ऑफलाइन पद्धतीने हाेत असून‎ लवकरच ऑनलाइन पद्धतीने केली‎ जाणार आहे. यामुळे नागरिकांचा‎ वेळ वाचणार.- डॉ. बापूसाहेब‎ नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक तथा‎ विवाहनोंदणी अधिकारी,‎ महापालिका‎

विवाह नोंदणीचे‎ हस्तलिखित प्रमाणपत्र‎
महापालिका प्रशासनाकडून‎ विवाह नोंदणीचे हस्तलिखित‎ प्रमाणपत्र दिले जात असल्याचे‎ निदर्शनास आले आहे. या‎ प्रमाणपत्रांच्या काेऱ्या प्रती या‎ कार्यालयातील टेबलावर‎ पडलेल्या असतात. या प्रती‎ कोणी नेल्यास त्याचा गैरवापरही‎ होऊ शकतो. यावर वैद्यकीय‎ अधिकाऱ्यांनी गांभीर्यांने लक्ष‎ देण्याची मागणी केली जात‎ आहे.‎

नोंदणी प्रक्रिया किचकट‎
विवाह नोंदणी करण्याची प्रक्रिया‎ किचकट झाल्याची तक्रार‎ नागरिकांकडून केली जात आहे.‎ यामुळे अनेकांनी विवाह नाेंदणीकडे‎ पाठ फिरवल्याचे चित्र आहे. विवाह‎ नोंदणीचे काम सक्षम अधिकाऱ्यांकडे‎ अतिरिक्त्त जबाबदारी म्हणून‎ सोपविलेले असल्याने त्यांच्याकडून‎ नियमित कामानंतर या कामाकडे लक्ष‎ दिले जाते. परिणामी नोंदणी‎ करणाऱ्यांना दिवसभर ताटकळत‎ बसावे लागते. तसेच प्रमाणपत्रास‎ उशीर होतो.‎

बातम्या आणखी आहेत...