आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन गटांत हाेणार स्पर्धा:जिताे रन द्वारे अहिंसेचा संदेश;‎ स्वच्छ, सुंदर नाशिकसाठी प्रयत्न‎

नाशिक‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिथे आज संपूर्ण जगात हिंसाचार होत‎ आहे, तिथे अहिंसा हाच एकमेव उपाय‎ मानला जातो. जगाला शांती आणि‎ अहिंसेचा संदेश प्रसारित करण्यासाठी,‎ आयआयएफएल जिताेद्वारे महावीर जयंतीचे‎ आैचित्य साधत शहरात पहिल्यांदाच‎ "अहिंसा रन’चे आयाेजन करण्यात आले‎ आहे. यात स्वच्छ, सुंदर नाशिकचा संदेशही‎ दिला जाईल.‎ जिताेच्या ६८ आणि २२ आंतरराष्ट्रीय‎ चॅप्टरने आपापल्या शहरात २ एप्रिल रोजी‎ सकाळी ५.३० वाजता ३ किमी, ५ किमी‎ आणि १० किमी अहिंसा रन आयोजित‎ करण्यात आल्याची माहिती जितो नाशिकचे‎ चेअरपर्सन अॅड. सुबोध शहा, कल्पना‎ पटणी, हर्षित पहाडे यांनी दिली.

अहिंसा रन‎ अनंत कान्हेरे मैदान येथून सुरू होऊन ३‎ कि.मी. सिबल हाॅटेल, ५ कि.मी. एबीबी‎ सर्कल, १० कि.मी. ते पुन्हा अनंत कान्हेरे‎ मैदान अशा तीन गटात स्पर्धा हाेईल.‎ नाशिककरांनी अहिंसा रनमथ्ये सहभागी‎ व्हावे, असे आवाहन जितो नाशिकच्या‎ वतीने करण्यात आले आहे.‎

‎‎‎‎‎विशेष म्हणजे ही ‘अहिंसा रन'' केवळ एक‎ समुदायापुरती मर्यादित नसून जगभरातून‎ अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना यात‎ आमंत्रित करण्यात आले आहे. सर्व‎ स्पर्धकांसाठी टी-शर्ट, मेडल आणि‎ नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.‎ यासंबंधीची अधिक माहिती सोशल‎ मीडिया वेबसाइट‎ www.ahimsarun.com आणि जितो‎ चॅप्टर, बिझनेस बे, तिडके कॉलनी येथे‎ नोंदणी करता येईल. जितो महिला विंगच्या‎ राष्ट्रीय अध्यक्षा संगीता ललवाणी यांनी‎ सांगितले की, यासाठी देशभरात जोरदार‎ तयारी सुरू आहे नक्कीच ही एक‎ ऐतिहासिक रन ठरणार आहे. त्याचा एक‎ भाग व्हा आणि जगभरात शांतता आणि‎ अहिंसेचा संदेश देण्यासाठी या कार्यात‎ सहभागी व्हा. हिंसा ही केवळ शारीरिक‎ नसून ती मानसिकही असू शकते आणि ती‎ केवळ मानवजातीसाठीच नाही तर प्रत्येक‎ जीवाशी असू शकते. प्रेम, क्षमा, त्याग ही‎ सर्व अहिंसेचीच रूपे आहेत. याचा प्रचार‎ या रनमध्ये केला जाईल.‎

आराेग्य संवर्धन, स्वच्छतेचाही जागर‎
महावीर जयंतीचे आैचित्य साधत या‎ रॅलीद्वारे अहिंसेचा संदेश देण्याबराेबर‎ आराेग्य संवर्धन, शहर स्वच्छतेचाही‎ जागर केला जाणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...