आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विमानसेवा विस्तारासाठी‎ आदित्यंचे सिंधियांना पत्र‎

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎नाशिकमधून विमानसेवेचा विस्तार‎ व्हावा, बंद झालेल्या सेवा पूर्ववत सुरू‎ व्हाव्यात याकरिता आता आदित्य‎ ठाकरे यांनीही केंद्रीय विमान‎ वाहतूकमंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया‎ यांना लिहिलेल्या पत्रात नाशिकसह‎ राज्यातील पाच विमानतळांच्या‎ विकासाबाबत मागणी केली आहे.‎ नाशिक हे तीर्थस्थळ असून‎ विमानसेवेची पूर्ण क्षमता असतांनाही‎ येथील सुरू असलेल्या फ्लाइट‌्स‌ बंद‎ करून नाशिककरांवर झालेला अन्याय‎ दूर करण्याची मागणी यातून करण्यात‎ आली आहे. यापूर्वी माजी‎ उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी‎ सिंधिया यांना बंद पडलेल्या‎ विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी‎ पत्रप्रपंच केला हाेता.‎

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ५०‎ विमानतळ, हेलिपॅडस‌् आणि पाेर्टस‌्‎ यांचा विकास, निर्माण, पुनर्निर्माण केले‎ जाणार असल्याची घाेषणा केली हाेती.‎ त्यानूसार महाराष्ट्राला यात प्राधान्य‎ दिले जावे असे साकडे आदित्य ठाकरे‎ यांनी या केंद्रीयमंत्री सिंधिया यांना‎ घातले आहे. यात, मुंबईला पुढील १०‎ वर्षात तिसऱ्या विमानतळाची गरज‎ असून पालघर जिल्ह्यात हे विमानतळ‎ उभारल्यास त्याचा फायदा कृषी,‎ प्रवासी तसेच पार्किंग यांसारख्या‎ सुविधांसाठी करता येऊ शकेल,‎ त्याबराेबरच, अजिंठा लेण्यांसाठी राेज‎ येणाऱ्या हजाराे पर्यटकांच्या दृष्टीने‎ फर्दापूर येथे विमानतळाची उभारणी‎ करावी, यासाठी बुद्धिस्ट देशांची मदत‎ घेता येऊ शकते याकडे ठाकरे यांनी‎ लक्ष वेधले आहे. पुणे विमानतळाच्या‎ विस्तारीकरणाचे भिजत पडलेले‎ घाेंगडे दूर करून पुणेकरांची‎ आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीची‎ क्षमता लक्षात घेण्याची विनंती‎ करण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...