आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:लवकरच हाेणार अंबड‎ पोलिस ठाण्याचे विभाजन‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक समस्या, अतिक्रमण, रस्त्यांच्या ‎खोदकामामुळे उद्भवणाऱ्या समस्या तसेच अवैध धंद्याला आलेला उत असे अनेक‎ गंभीर प्रश्न उद्याेजकांनी मांडल्याने निमाने ‎बाेलावलेली विविध प्रशासकीय ‎अधिकाऱ्यांसाेबतची बैठक चांगलीच‎ गाजली. याच बैठकीत प्रदूषण नियंत्रण‎ मंडळ तसेच विद्युत मंडळाच्या‎ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले गेले. ‎दुहेरी फायरसेसचा प्रश्न मार्गी लागला‎ असून १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी ‎ ‎ होईल असे महापालिका आयुक्तांनी‎ सांगितले. अंबड पाेलिस ठाण्याचे विभाजन ‎ ‎ लवकरच हाेऊन नवे पाेलिस ठाणे कार्यरत ‎ ‎ हाेणार असल्याची माहीती पाेलिस आयुक्त‎ अंकुश शिंदे यांनी दिली.‎

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार‎ महापालिका, पोलिस, महसूल,‎ ‎ ‎एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच‎ संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची‎ महत्त्वाची बैठक बुधवारी झाली.‎ व्यासपीठावर महापालिका आयुक्त चंद्रकांत‎ पुलकुंडवार, पोलिस आयुक्त‎ अंकुश शिंदे, निमाचे अध्यक्ष‎ धनंजय बेळे, सचिव राजेंद्र अहिरे,‎ महाराष्ट्र औद्योगिक विकास‎ मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन‎ गवळी, कामगार उपायुक्त विकास‎ माळी, जिल्हा उदयोग केंद्र‎ सहसंचालक शैलेंद्र राजपूत अादी‎ होते. सीईपीटी करू, नीरीचा‎ अहवाल आला असेल तर या‎ मुद्यावर पुढे जाऊ अशी घोषणा‎ महापालिका आयुक्त पुलकुंडवार‎ यांनी केली .सातपुरला शहरात गॅस‎ पाइपलाइन जाळे होणार आहे.‎ चुकीची कामे करू नका असे‎ मोबाइल कंपन्यांना सांगितले आहे.‎

तुमचे काम करतांना दुसऱ्या‎ युटिलिटीला तडे नको असे त्यांना‎ बजावले आहे. सर्व यंत्रणांनी‎ समन्वय ठेवावा. एलबीटीचे परतावे‎ लवकर होतील, असेही ते म्हणाले.‎ जाचक मालमत्ता कराबाबत‎ बोलताना इंडस्ट्रियल स्लॅब करू‎ असे आयुक्तांनी सांगितले.‎ सांडपाण्याचा प्रकल्प अमृत-२ मधून‎ घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते‎ म्हणाले.

‎ ‎ कामगारांना वाहतूक नियमांचे पालन‎ करण्यास सांगा : सर्वांनी नियम‎ पाळल्यास वाहतूक समस्येला‎ आळा घालणे शक्य होईल, प्रत्येक‎ उद्याेगाने त्यांच्या कामगारांना‎ वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी‎ प्रवृत्त केल्यास बेशिस्त वाहतुकीचा‎ प्रश्न ५० टक्के सुटेल असे अावाहन‎ पाेलीस अायुक्त अंकुश शिंदे यांनी‎ केले.‎ वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र‎ फड यांनी वाहतूकदारांचे प्रश्न मांडून‎ सध्या बंद असलेल्या सर्व जकात‎ नाक्यांवर ट्रक टर्मिनस उभारल्यास‎ वाहतुकीला आळा बसू शकेल असे‎ ते म्हणाले.‎‎

अतिक्रमणे हटविण्यासाठी‎ संयुक्त माेहीम राबवणार‎
आयटीआय सिग्नल, एक्सलो पॉइंटसह तीन‎ ठिकाणी सातत्याने वाहतूक ठप्प होते.‎ कुठलेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार‎ नाही व ते तातडीने काढल्या जाईल अवैध‎ धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पहाता‎ महापालिका आणि संबंधित यंत्रणांबराबर‎ संयुक्त मोहीम हाती घेतली जाईल तसेच‎ अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका,‎ पाेलिस आणि एमआयडीसी यांची‎ संयुक्तपणे माेहीम राबविली जाइल असे‎ महापालिका आयुक्त व पाेलिस आयुक्तांनी‎ यावेळी स्पष्ट केले.‎

बातम्या आणखी आहेत...