आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वच्छ कारभारासाठी अधिकाऱ्यांना पुरस्काराची शक्कल‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये एका ज्येेष्ठ उद्याेजकाने थेट‎ एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात पत्र‎ देऊन प्रत्येकी एक स्वच्छ, प्रामाणिक,‎ कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम वर्ग-२ यांना राेख‎ रक्कम व पुरस्काराने गाैरविण्याचा चंग बांधला‎ आहे. हा एक अनाेखा प्रयाेग असून याकरीता‎ त्यांनी थेट एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय,‎ अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता‎ यांच्या कार्यालयाला पत्र दिले आहे.

या‎ कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या‎ पुरस्काराबाबत माहिती द्यावी, अर्जाचा नमुना‎ तयार असून ज्यांचे अजे येतील त्यांची‎ मुलाखत घेऊन पुरस्कार दिले जाणार आहेत.‎ सातपूर येथील शंभर टक्के निर्यात उद्याेग‎ असलेल्या जाेटाे अॅब्रासिव्ह या उद्याेगाचे‎ मालक ज्येष्ठ उद्याेजक जयप्रकाश जाेशी यांनी‎ हा नावीन्यपूर्ण पुरस्कार देण्याचा उपक्रम हाती‎ घेतला आहे. याकरीता त्यांनी विशिष्ट निधीही‎ राखीव ठेवला असून राज्यातील हा पहिलाच‎ निराळा प्रयाेग मानला जात आहे.

विशेष‎ म्हणजे, जाेशी यांच्याकडून पाच वर्षांपूर्वी‎ एमआयडीसीने उद्याेग विस्तारासाठी भूखंड‎ देण्यासाठी काेट्यवधी रुपये भरून घेतले‎ असतानाही वेगवेगळे चार भूखंड दाखवले.‎ मात्र, पाच वर्षांत एकाही भूखंडाचा कब्जा‎ दिलेला नाही. एमआयडीसीच्या कामाबद्दल‎ त्यांनी वारंवार मुख्यालयात तक्रारीदेखील‎ केलेल्या आहेत. त्यातच आता त्यांचा हा नवा‎ प्रयाेग उद्याेगवर्तुळात चर्चेचा विषय बनला‎ आहे.‎

जर पुरस्कारसासाठी अर्जच नाही आला‎ तर कारभार भ्रष्ट हे समजून घेता येईल‎
लाेकांना स्वच्छ व पारदर्शक कारभार‎ मिळावा, इतरांनाही कळावे की येथेही चांगले‎ ‎ कर्मचारी, अधिकारी आहेत‎ ‎ त्यासाठी ही संकल्पना आहे.‎ ‎ त्याला कितीत प्रतिसाद येताे हे‎ ‎ बघणे खरेतर महत्त्वाचे ठरणार‎ ‎ आहे. १ आॅगस्टला‎ ‎ एमआयडीसीच्या वर्धापनदिन‎ असताे. त्याच दिवशी हा पुरस्कार दिला जाणार‎ आहे. जर काेणीच अर्ज केला नाही तर ये थे‎ फक्त भ्रष्ट लाेक आहेत असा अर्थ नक्कीच‎ निघेल. - जयप्रकाश जाेशी, ज्येष्ठ उद्याेजक,‎ नाशिक‎

खरच पुरस्कारासाठी अर्ज‎ येणार? उद्याेजकांचे लक्ष
खरं तर निमा किंवा आयमा‎ यांसारख्या आैद्याेगिक‎ संघटनांकडून अशा प्रकारे पुरस्कार‎ देणे उचित ठरले असते. पण‎ एमआयडीसीच्या कारभाराने‎ पिचलेल्या जाेशी यांनी पुढे येत हा‎ उपक्रम हाती घेतला असल्याने‎ नवल व्यक्त केले जात आहे.‎ महत्वाचे म्हणजे, स्वच्छ,‎ कार्यक्षम, कर्तव्यदक्ष अशा‎ वर्गवारीत खरच किती अर्ज‎ पुरस्कारासाठी येतात याकडे आता‎ उद्याेजकांचेच लक्ष लागले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...