आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सल्युझिव्ह‎:राज्यात सर्वाधिक अपघात नाशिक जिल्ह्यात, निश्चित करणार ब्लॅकस्पॉट‎

‎संदीप जाधव | नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत‎ असून जानेवारी २०२२ जून या सहा‎ महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहर व‎ जिल्ह्यात ६०२ जणांचा अपघाती मृत्यू झाला‎ आहे. मागील काही वर्षांपासून रस्ते‎ अपघातांचे प्रमाण वाढले असून राज्यातील‎ सहा महिन्यांची आकडेवाडी पाहता १७ हजार‎ २७५ अपघात झाले असून यात ८ हजार ६८‎ जणांचा विविध अपघातांत मृत्यू झाला आहे.‎

१४ हजार २०० जण कायमचे जायबंदी झाले‎ आहेत. जिल्ह्यात ५१८ व शहरात १०२‎ अपघाती मृत्यू झाले आहे. राज्यातील‎ आकडेवारी बघता नाशिक जिल्ह्यात‎ सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात‎ आली आहे.‎ रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक‎ परिवहन विभागाकडून प्रभावी नियोजन होत‎ नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.

‎नाशिक आरटीअोकडून रस्ते सुरक्षा अभियान‎ अंतर्गत उपक्रम केले जातात. मात्र रस्ते‎ अपघात टाळण्यासाठी ठोस नियोजनाचा‎ अभाव दिसून येत आहे. जानेवारी ते जून‎ २०२२ राज्यात अपघातांची आकडेवारी बघता‎ नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक अपघातांची नोंद‎ झाल्याने जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा‎ बनले आहेत. राज्यात १७ हजार २७५‎ अपघातात ८०८६ जणांचा मृत्यू झाला आहे.‎ यामध्ये नाशिक विभागातील नाशिक जिल्हा‎ व शहरातील रस्त्यांवर घडलेल्या अपघातात‎ ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे.‎ अहमदनगरमध्ये ४५१ जणांचा अपघाती मृत्यू‎ झाला आहे. पुणे जिल्ह्यात ४६१, शहरात १६५‎ मुंबई शहरात १५६ अपघाती मृत्यू झाले आहे.‎

राज्यातील 38 जिल्ह्यातील जिल्हानिहाय अपघातांची आकडेवारी‎
नाशिक : ५१८, नंदुरबार : १०२, अहमदनगर : ४५१, धुळे :‎ १९९, जळगाव : २९५, अकोला : ७६, अमरावती : १८७,‎ बुलढाणा : २०४, यवतमाळ :२२६, वाशिम : ८२,‎ अौरंगाबाद : २५३, जालना : २०५, बीड : २५६,‎ उस्मानाबाद :१८४, नांदेड : १९७, लातूर : १७७, परभणी :‎ ९५, हिंगोली : ११०, कोल्हापूर : २४१, पुणे :४६१, सांगली :‎ २१३ सातारा- २७६, सोलापूर : ३२५, भंडारा : १०१, चंद्रपूर‎ : २४२, गडचिरोली : २४२, गाेंदिया : ७६, नागपूर : २६०,‎ वर्धा: १२५, रायगड : ९५, रत्नागिरी : ९५, सिंधुदुर्ग : ३८,‎ ठाणे : ११९ तर नाशिक शहर- १०२, मुंबई- १५६,‎ औरंगाबाद- १०१ , नवी मुंबई : १५६, अमरावती : ५३,‎ पिंपरी चिंचवड : १५२‎

आरटीआेकडून‎ उपाययाेजना सुरू‎
‎रस्ते अपघात‎ ‎ रोखण्यासाठी‎ ‎ आरटीअोकडून‎ ‎ रस्ते सुरक्षा‎ ‎ अभियानांतर्गत‎ ‎ प्रभावी नियोजन‎ केले जात आहे.‎ जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे‎ ब्लॅक स्पाॅट निश्चित करण्यात‎ येत असून या स्पाॅटवर अपघात‎ रोखण्यासाठी नियोजन केले‎ जात आहे. - वासुदेव भगत,‎ उपप्रादेशिक अधिकारी,‎ आरटीओ‎

बातम्या आणखी आहेत...