आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची कसरत:सिटी लिंक थांबे रिक्षांसाठी! बस थांबतात‎ रस्त्याच्या मध्यभागी, वाहतूक कोंडीत भर‎; अपघात हाेण्याची शक्यता‎

जहीर शेख | नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्ट सिटी व पाेलिस प्रशासनाचे दुर्लक्ष - Divya Marathi
स्मार्ट सिटी व पाेलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक‎ शहरातील सिटी लिंकचे बस थांबे‎ रिक्षाचालकांनी ताब्यात घेतले आहेत.‎ परिणामी, बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या‎ रिक्षांमुळे बस थेट रस्त्यावर थांबवून प्रवाशांची‎ चढ-उतार करावी लागत असल्याने वाहतूक‎ काेंडीची समस्या निर्माण हाेत आहे.

विशेष‎ म्हणजे, स्मार्ट रोडवरील सिटी लिंक शहर‎ बससेवेचे थांबेही रिक्षांचे अड्डे झाले आहेत. बस‎ थांब्याच्या पिवळ्या चौकोनात रिक्षा थांबत‎ असल्याने या भागातही बस रस्त्याच्या मधोमध‎ थांबतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक‎ काेंडीची समस्या निर्माण हाेत आहे.

यासंदर्भात‎ स्मार्ट सिटी वा वाहतूक पोलिस शाखेकडून‎ कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.‎ यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा‎ प्रकाशझोत...‎ शहरातील अनेक बस थांब्यांवर अनधिकृत‎ पद्धतीने रिक्षा थांबे निर्माण झाले आहे. स्मार्ट‎ रोड असलेला त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या‎ रोडवर फुटपाथ, सायकल ट्रॅक बनविण्यात‎ आला आहे.

त्याचबराेबर सिटी लिंक शहर‎ बससाठी आकर्षक थांबे उभारण्यात येऊन‎ रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहून बस‎ थांबण्यासाठी पिवळ्या पट्ट्यातील चौकोन‎ आखण्यात आलेला आहे. परंतु, फुटपाथवर‎ अनधिकृतरित्या दुचाकींची तर सायकल‎ ट्रॅकवर चारचाकी वाहनांची सर्रासपणे पार्किंग‎ केली जाते. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य‎ रस्त्यानेच मार्गक्रमण करावे लागत असल्याने‎ वाहनांना अडथळा निर्माण हाेताे.‎ रिक्षाचालकांसाठी स्मार्ट रोडवरील‎ त्र्यंबकनाका, सीबीएस आणि अशोकस्तंभ येथे‎ अधिकृत रिक्षा थांबे आहेत. असे असतानाही‎ रिक्षाचालक स्मार्ट रोडवर असलेल्या बस‎ थांब्यावर प्रवाशांसाठी रिक्षा थांबवून ठेवतात.‎

त्यामुळे वाहतूक खोळंबून कोंडीची समस्या ही‎ या रोडवर नित्याची झालेली आहे. डी. बी.‎ स्टारने या रस्त्याची पाहणी केली असता‎ वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे पोलिस‎ प्रशासनासह स्मार्ट सिटीच्या‎ अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष केले जात‎ असल्याचे चित्र दिसून आले.‎

नागरिक‎प्रवाशांना उभे रहावे‎ लागते उन्हात‎ सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.‎ स्मार्ट रोडवर सिटी लिंक बसचे थांबे‎ आहेत. परंतु, या थांब्यांवरच रिक्षा‎ थांबे आणि विक्रेत्यांचे बस्तान आहे.‎ त्यामुळे प्रवाशांना थांब्यांच्या‎ शेडमध्ये जागा रहात नसल्याचे डी.‎ बी. स्टारच्या पाहणीत समोर आले.‎ त्यामुळे त्यांना पादचारी रस्त्यावर‎ बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे‎ लागते. तर, विद्यार्थी, प्रवासी,‎ महिला, ज्येष्ठ नागरिक भरदुपारी‎ उन्हात उभे राहतात.‎रिक्षांच्या गराड्यातून मार्ग काढत‎ पकडावी लागते बस‎ अनधिकृतपणे रिक्षा थांबे थाटून शहर बससेवेला‎ अडथळा निर्माण करणाऱ्या या रिक्षाचालकांवर‎ वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत‎ नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे.‎

रिक्षांमुळे रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या‎ बसपर्यंत वाट काढत बसमध्ये शिरावे लागते. ही‎ कसरत करताना अनेकदा किरकोळ स्वरूपाचे‎ अपघातही होतात. यातून भविष्यात गंभीर‎ स्वरूपाचा अपघात होण्याचीही शक्यता‎ नाकारता येत नाही.‎अतिक्रमणांमुळे त्रास‎ सिटी लिंकच्या बस थांब्यांवर‎ अतिक्रमणांसह रिक्षाचालकांचे अवैध‎ थांबे निर्माण झाले आहे. यामुळे बसेस‎ रस्त्याच्या मधोमध उभे करावे लागतात.‎ यामुळे बसच्या मागे प्रचंड वाहतूक कोंडी‎ निर्माण होते. यासंदर्भात पोलिस‎ खात्याला वारंवार पत्रव्यवहार करूनही‎ त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.‎ याकडे आता पोलिस आयुक्तांना लक्ष‎ देण्याची गरज आहे. - मिलिंद बंड,‎ महाव्यवस्थापक, सिटी लिंक‎

पाेलिसांची नियुक्ती,‎ मात्र कारवाई शून्य‎

शहरातील स्मार्ट रस्त्यांसह अनेक ठिकाणी सिटी‎ लिंक बसच्या थांब्यांचा ताबा रिक्षाचालकांनी‎ घेतलेला आहे. या ठिकाणी बस लावायला जागा‎ रहात नाही यामुळे बसचालक रस्त्यांचे मधोमध‎ बस थांबवतात. परिणामी या ठिकाणी वाहतूक‎ कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे, अशोकस्तंभ,‎ मेहेर सिग्नलसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे‎ बाहेर वाहतूक पोलिसांची नियुक्ती असतानाही‎ त्यांच्याकडून या सिटी लिंकच्या बस थांब्यांवर‎ उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कुठलीही कारवाई केली‎ जात नाही.‎

पोलिसांनी लक्ष द्यावे‎ शहरातील अनेक ठिकाणी बस‎ स्टॉपवर रिक्षा थांबे झाले आहे.‎ त्यामुळे बस ही थेट रस्त्याच्या‎ मध्यभागी उभी करावी लागते.‎ त्यामुळे या ठिकाणी वाहतूक‎ कोंडी निर्माण होते तसेच‎ अपघाताच्या ही धोका असतो.‎ वाहतूक पोलिसांनी या अनधिकृत‎ रिक्षा थांब्यांवर कारवाई‎ करण्याची गरज आहे.‎ - गणेश सोलापूरकर, नागरिक‎