आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अशोका मार्गासह काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. गढूळ पाण्याची तक्रारी वाढत असून, यामुळे रोगाचा प्रसार अधिक होत आहे. शहरात ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार बहुतांश रहिवाशांकडून केली जात आहे. शहरातील अशोकामार्ग, वडाळारोड, पखालरोड, काटे गल्ली, जुने नाशिक, इंदिरानगर, विनयनगर, जयदीपनगर, सातपूर भागात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या भागातील ड्रेनेजमधून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेल्याने हा प्रकार सुरू झाला आहे.
या पाण्यामुळे स्थानिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून शहरात काविळीचे ही रुग्ण वाढले आहे. काही दिवसांपासून जुने नाशिकसह पूर्व भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील खासगी व महापालिकेच्या रुग्णालयात उलट्या, जुलाब, टायफॉइड, अतिसार, अचानक ताप येणे आदी विकारांचे रुग्ण उपचारांसाठी दाखल होत आहे. दूषित पाण्यामुळे रुग्णांचा हा आकडा वाढतच असल्याची ही चर्चा नागरिकांमध्ये आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.