आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मवीर बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याचा वारसा घेत दरी येथे श्रमदान शिबिरात कार्य केले. सावित्रीबाई फुले अंतर्गत चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमदान शिबिराचा दुसरा दिवस दरी या गावात पार पडला.
नियोजित वेळापत्रकानुसार श्रमदान शिबिराच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करण्यात आले. पाणी आडवा, पाणी जिरवा या योजनेंतर्गत गावाच्या कडेच्या डोंगरावर सरळ समतल विद्यार्थ्यांनी अतिशय जिद्दीने बांधले. जेणेकरून पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरेल व गावाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होईल. नेहमी ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे म.वि.प्र संस्थेने हे धोरण हाती घेतले आहे. दुपारच्या सत्रात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर यांनी मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.