आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखा. हेमंत गोडसे यांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यातून निवड झालेल्या १२७४ बेरोजगार तरुणांना थेट नियुक्तिपत्र देण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे व खा. गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तिपत्र वाटप करण्यात आले.
युवती सेनेच्या पदाधिकारी भक्ती गोडसे यांच्या संकल्पनेतून लक्ष्मी लॉन्सवर हा मेळावा झाला. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखरपाटील, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, प्रवीण तिदमे, महंत सुधीरदास पुजारी, लक्ष्मीबाई ताठे, किरण रहाणे आदी उपस्थित होते.
५०० कोटींचे अनुदान : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी तीन वर्षांमध्ये केवळ १७० कोटी रुपये खर्च केले. तर सत्तांतर झाल्यानंतर पाच महिन्यांत मुख्यमंत्री शिंदे यांनी रोजगार निर्मिती योजनेसाठी ५०० कोटींचे अनुदान दिल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात असे रोजगार मेळावे होणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.