आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पुरवठा विभागाला रेशनकार्ड उपलब्ध होत नसल्याचे कारणे देत गेल्या दिड वर्षापासून विविध महा ई सेवा केंद्रातील दोन हजारांवर रेशनकार्डचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले होते. तसेच, अनेक अर्ज गहाळ झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने डीबी स्टारच्या माध्यमातून २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध केले हाेते. त्यानंतर प्रशासनाला जाग येत पुरवठा विभागाने आठवडाभरात एक हजारावर रेशनकार्डचे वितरण केल्याची माहिती धान्य वितरण अधिकारी नितिन गर्जे यांनी दिली. रेशनकार्डचे अर्ज गहाळ व कोऱ्या रेशनकार्डाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना रोज या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत हाेत्या.
नविन रेशनकार्ड काढण्यासाठी तसेच, रेशनकार्ड हरवले किंवा खराब झाले असेल तर नविन रेशनकार्डसाठी पुरवठा कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. जिल्हाभरातील सुमारे तीन हजार नागरिकांनी नविन रेशनकार्डसाठी अर्ज केलेला होता. तसेच, अनेक नविन अर्जदारांनाच रेशनकार्ड मिळत नसल्याचे चित्र अजूनही आहे. अनेकांना अर्ज गहाळ झाल्याचे ही उत्तर मिळत होते. तसेच, काहींची रेशनकार्डाची प्रक्रिया पूर्ण होऊनही ग्राहकांना रेशनकार्ड मिळत नसल्याची तक्रार होती.
रेशनकार्डचे काही अर्ज सापडत नव्हते तर काही प्रलंबित होते.दैनिक दिव्य मराठीत यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सपूर्ण अर्जाची माहिती घेऊन प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले.तसेच,अर्जदारांना फोन करून बोलून रेशनकार्डांचे वितरण करण्यात आले आहे. - नितीन गर्जे, धान्य वितरण अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.