आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणावर महागल्यानंतर केंद्र सरकारने आयात कर व कृषी सेस शून्य टक्के केला हाेता. या दिलेल्या माेठ्या सवलतीचा परिणाम प्रत्यक्ष बाजारात दिसायला लागला आहे. केवळ पंधराच दिवसांत खाद्यतेलाचे दर किरकाेळ बाजारात लिटरमागे 5 ते 45 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, इंडाेनेशियातून नियमित झालेली पामतेलाची आयात आणि देशात मान्सूनचे वेळेवर झालेले आगमन, त्यामुळे चांगले तेलबियांचे पीक हाती येण्याची सुचिन्हे व खाद्यतेलाची कमी झालेली मागणी याचा एकत्रित परिणामस्वरुपी येत्या काळात हे दर आणखी स्वस्त हाेतील.
आयातशुल्क माफ
भारत सूर्यफुलाचे तेल रशिया, युक्रेन व अर्जेंटिना या तिन देशातून तर पाम तेलाची आयात इंडाेनेशिया व मलेशियातून मोठ्या प्रमाणावर करताे. मार्च महिन्यात रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने सूर्यफूल तेलाची आयात ठप्प झाली. ती अजूनही प्रभावित आहे. दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे इंडाेनेशियात पामची फळे झाडावरच वाया गेली. यामुळे तेथे खाद्यतेलाचे संकट निर्माण झाले व या देशाने पामतेलाची निर्यात बंद केली हाेती. याचा परीणाम भारतात अगाेदरच महागात असलेल्या खाद्यतेलाच्या दरांचा भडका उडाला होता. मात्र, अर्जेटींनाकडून सूर्यफूल तेलाची आयात सुरू झाली आणि इंडाेनेशियाने निर्यातबंदी उठवली तर भारत सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील आयात शुल्क पूर्णपणे माफ केल्याने मोठ्या आयातकांना प्रोत्साहन मिळाले.
अजून स्वस्त हाेण्याची शक्यता
केंद्र सरकारने आयात कर व कृषी सेस रद्द केल्याचा प्रत्यक्ष परीणाम बाजारात आता दिसू लागला असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. वाढलेली आयात, मान्सुनचे वेळेवर आगमन व कमी झालेली मागणी यामुळे तेलाचे हे दर अजून कमी हाेण्याची शक्यता आहे, असे खाद्यतेल ब्राेकर परेश बाेघाणी यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.