आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिंपळगाव परिसरातील शिरसगाव येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना शेतकरी बांधवांनी घेराव घालत नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदी दराबाबत प्रश्न उपस्थित केले. शिरसगाव येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार उपस्थित होत्या. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत नाफेड अल्प दरात कांदा खरेदी करत आहे. कांदा जागतिक पातळीवरील दराने खरेदी करावा. कांद्याच्या दराबाबत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप केला. निर्यात वाढली, मग शेतमालास भाव का नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.