आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरालगतच्या परिसरातही दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी , अन्यथा आंदाेलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. अंबड, चुंचाळे, विल्होळी, पाथर्डी, वडनेर, पिंपळगाव, दाढेगाव, रायगड नगर परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील द्राक्ष, कांदा, गहू, टाेमॅटाे यासारख्या पिकांचे मोठे नुकसान हाेऊन उभी पिके अक्षरशः शेतात झोपली गेली आहेत.
द्राक्षाच्या घडाला लावलेले पेपर फाटल्याने द्राक्ष मण्यांना तडे गेले. आहेत. काही शेतकऱ्यांचा माल तर दोन ते चार दिवसात व्यापारी नेणार होते. पण गहू, पिका बरोबर टोमॅटो, कोथिंबिर, मेथी, इतर पालेभाज्याही भुईसपाट झाल्याने लाखाेंचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी मनोहर भावनाथ, रंजन कदम, त्र्यंबक कोंबडे, बंडू धोंगडे, धनंजय गवळी, विष्णू कोंबडे, अंबादास जाचक, सदाशिव जाधव, विश्वनाथ मुंडे आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.