आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी भागातील मोंढेनगरमधील रामभूमी राेहाउस, वाटिका सोसायटी, रखुमाई राेहाउस येथील नागरिकांना सहा महिन्यांपासून पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने संतप्त महिलांनी पालिकेच्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पाणीप्रश्न तात्काळ न सोडविल्यास राजीव गांधी भवनावर मोर्चा नेण्यात येइल असा इशाराही महिलांनी दिला. पाथर्डी परिसरातीला मोंढे नगरमधील पाणी प्रश्नाबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार तसेच, निवेदन देऊनही पाणी समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने अखेर महिलांनी हंडा मोर्चा काढला होता. पाण्याअभावी दैनंदिन कामेही हाेत असल्याने महापालिकेने तत्काळ पाणीप्रश्न निकाली काढण्याची मागणी यावेळी महिलांनी केली.
परिसरातील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन महापालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. - भगवान दोंदे, माजी नगरसेवक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.