आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड परिसरात गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी अनियमित येत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दाेन-तीन दिवस उलटूनही घंटागाडी येत नसल्याने डस्टबिन भरून जात असल्याने हा कचरा टाकावा तरी कुठे असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
त्यातच आेल्या कचऱ्यातून दुर्गंधी निर्माण हाेत असल्याने त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागात घंटागाडी नियमित करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.