आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्र्यंबक या मुख्य रस्त्यावरील एबीबी सिग्नल व आयटीआय सिग्नलच्यामध्ये असलेल्या कुकुट पालन केंद्रासमोर रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षाचालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 11) सकाळी हा अपघात घडला. पोपट कृष्णा सोनवणे असे रिक्षा चालकाचे तर शैला शांतीलाल पटणी असे प्रवासी महिलेचे नाव आहे.
नाशिक शहराकडून सातपूरकडे रिक्षाचालक सोनवणे हे (एमएच 15 एफ यू 0360) या क्रमांकाच्या रिक्षाने प्रवासी घेऊन सातपूरकडे येत असताना रिक्षावर गुलमोहरचे मोठे झाड कोसळले. या घटनेत दोघेही जागीच ठार झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत रिक्षाचालक आणि प्रवासी रिक्षाताच अडकून होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत रिक्षावर कोसळलेले झाड दूर केले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा
मनपाच्या वतीने पावसाळापूर्वीची कामे पूर्ण न केल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनी केला आहे. या घटनेनंतर तरी मनपा प्रशासनाने जागृत होऊन मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.