आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यमंथन:पुस्तके कधीही‎ डिलीट हाेत नाही, कागदावरचे काळजावर‎ उमटते पुस्तकांमुळेच- लेखक प्रवीण दवणे

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल माेबाईलवर लिहिलं जातं.‎ साेशल माध्यमांतून ते पाेहाेचतंही पण ते ‎ लेखन डिलीट होते. पुस्तके कधीही‎ डिलीट हाेत नाहीत. कागदावरचे‎ काळजावर येण्याची गरज पुस्तकांचीच ‎असते असा संवाद लेखक, कवी,‎ गीतकार प्रवीण दवणे यांनी साधला.‎

कुसुमाग्रज स्मारकात रविवारी (दि.‎ ७) अ. भा. प्रकाशक संघाच्या चाैथ्या ‎ ‎ लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात‎ दवणे यांना सरकारी वकील उज्ज्वल‎ निकम यांच्या हस्ते साहित्यसेवा कृतज्ञता ‎ ‎ पुरस्कार अाणि पाॅप्युलर प्रकाशनचे‎ रामदास भटकळ यांना जीवनगाैरव‎ पुरस्कार प्रदान करण्यात अाला.

यावेळी ‎ व्यासपीठावर स्वागताध्यक्ष विश्वास‎ ठाकूर, नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास‎ पाेतदार, सुभाष सबनीस उपस्थित हाेते.‎ दवणे पुढे म्हणाले की, अाज लेखकाने‎ प्रकाशकाच्या हातात हात गुंफले पाहिजे.‎ पुस्तकं विक्रीसाठी त्यानेही प्रयत्न केले‎ पाहिजे. जे विकत घेतलं जात ते निगुतीनं‎ वाचलंही जातं. अाज शाळेच्या पायऱ्या‎ हरवलेल्या अाहेत. पाठीवर न्यायची‎ पुस्तकं म्हणून ती पाठ्यपुस्तकं झाली‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ अाहेत.

टकवा उडालेली पिढी निर्माण‎ हाेते अाहे. त्यामुळे त्याचा विचार करुन‎ एक वेगळी वाचन चळवळ उभी राहणे‎ गरजेचे असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.‎ तसेच हा पुरस्कार मला भावनिक‎ अनुबंधाचा पुरस्कार वाटताे. मात्र केवळ‎ लिहून चालत नाही. तर ते प्रकाशितही‎ करावं लागतं. त्यात वाचकांच्या‎ प्रतिसादाची सरस्वती मिसळते. मी‎ कधीही असं म्हणत नाही की, माझं‎ ‎पुस्तक खपत नाही. जाे प्रामाणिकपणे‎ लिहिताे त्या लिखाणाला न्याय मिळताेच‎ यावर माझा विश्वास असल्याचही त्यांनी‎ नाेंदवलं.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक‎ प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे‎ यांनी केले तर वसंत खैरनार यांनी‎ परिचय करून दिला. संदीप देशपांडे‎ यांनी मानपत्राचे वाचन केले. या‎ कार्यक्रमानंतर जनस्थानातील साहित्य‎ परंपरा या विषयावर चर्चासत्र पार पडले. यात सुरेश भटेवरा, वैशाली‎ बालाजीवाले, मृदुला बेळे, प्रशांत पाटील‎ व राहुल रनाळकर यांनी सहभाग घेतला.‎

त्यानंतर सुदेश हिंगलासपुरकर यांचा‎ तसेच नाशिकमधील प्रकाशक, साहित्य‎ पुरस्कार विजेते आणि दिवाळी अंक‎ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.‎ मधुर बेळे व रवींद्र मालुंजकर यांनी‎ सुत्रसंचालन केले तर सुभाष सबनीस‎ यांनी आभार मानले.‎

आजही वयाच्या ८८ व्या वर्षी नाशिकला‎ गायचे आहे: रामदास भटकळांची इच्छा‎

प्रकाशन संस्थेत कर्मचाऱ्यांपासून ते संपादकांपर्यंत सर्वांचा‎ हा गाैरव आहे. लेखकांमुळेच प्रकाशन संस्थेचा गाडा‎ सुरळीत सुरु आहे. उथळ पुस्तकांच्या कधीच मागे लागलो‎ नाही. टिकतील आणि कायम मागणी राहील, अशाच‎ पुस्तकांचे प्रकाशन केले. नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या‎ आग्रहाखातर मी शंभर लोकांच्या साक्षीने शास्त्रीय‎ गायनाची मैफल सजविली होती. मी चांगले गातो, यावर‎ कुसुमाग्रजांनी केलेल्या चेष्टेमुळे त्यांच्यासमोर मैफल सादर‎ केल्यानंतरच मी चांगले गाऊ शकतो, याचा त्यांना विश्वास‎ बसला. आजही वयाच्या ८८ व्या वर्षी पुन्हा नाशिकला‎ येऊन गाणे सादर करण्याची इच्छा आहे, असे भटकळ‎ यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.‎

समाज माध्यमांच्या रेट्यातह पुस्तके घेऊन‎ वाचण्याकडे चांगलाच कल

समाज माध्यमांच्या रेट्यापुढे छापील पुस्तके टिकाव धरणार‎ नाहीत हा अपप्रचार असून आजही छापील पुस्तकांकडे‎ वाचकांचा कल आहे. कागदांच्या वाढलेल्या दरांमुळे पुस्तक‎ प्रकाशित करणे आणि वितरीत करणे यात अडथळे येत असले‎ तरी प्रकाशक, लेखक आणि वाचक यांनी सुवर्णमध्य काढत‎ एकत्रित जबाबदारी घेऊन वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी‎ एकत्रीत प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या‎ प्रसारक समाजचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले .‎

यावेळी राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार‎ मिळाल्याबद्दल ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर यांचा सत्कार‎ करण्यात आला. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रकाशकांचा यावेळी‎ प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात येऊन या साहित्य‎ संमेलनाचा समाराेप करण्यात अाला.‎