आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंटांचे स्थलांतर:7 दिवसांत 8 उंटांचा मृत्यू; स्थलांतराची तयारी‎, पर्यावरणीय बदल, भौगोलिक स्थितीचे कारण‎

नाशिक‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांजरापपोळ येथे ठेवण्यात आलेल्या‎ उंटांच्या प्रकृतीवर शहराच्या वाढत्या‎ तापमानासह त्यांच्या‎ आहार-विहारात होत असलेल्या‎ बदलाचा परिणाम होत आहे.‎ परिणामी गेल्या ७ दिवसांत ८ उंटांचा‎ मृत्यू झाल्याचे प्राणी अभ्यासकांनी‎ नाेंदविले आहे.

दरम्यान शनिवारी‎ (दि. १३) पांजरापपोळ येथे अाणखी‎ एका उंटांचा मृत्यू झाला. अातापर्यंत पांजरापपोळ येथे ७ तर मालेगावच्या ‎गाेशाळेत एका उंटाचा मृत्यू झाला‎ आहे.

नक्की प्रकरण काय?

आठ दिवसांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर उंट आ​​​​​​​ढळून आ​​​​​​​ले. हे सर्व उंट‎ कत्तलसाठी नेले जात असल्याचा संशयावरुन‎ प्राणीमित्रांनी पांजरपाेळ येथे १११ उंट दाखल केले.‎ तर मालेगाव येथे देखील ४३ उंट तेथील गाेशाळेत‎ दाखल आहेत. या सर्व उंटांना गुजरातमधील‎ राजचंद्र मिशन या संस्थेच्या मदतीने राजस्थान येथे‎ पाठविण्यात येणार आहे. या उंटांना राजस्थान येथे ‎पाठविण्यासाठी पशुसंवर्धवन विभागातून लसीकरण‎ करण्याबराेबरच टॅर्गिंग देखील पूर्ण करण्यात आले‎ आहे.​​​​​​​

राजस्थानातील महावीर‎ कॅमल सेंचुरी या संस्थेकडे हे सर्व उंट सुपूर्द केले‎ जाणार आहेत. अशी परिस्थिती असतांना‎ दुसरीकडे ७ दिवसात मात्र अाठ उंटांचा मृत्यू‎ झाल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमाेर नवी चिंता‎ निर्माण झाली आहे.‎

आठ दिवस उलटूनही मालक सापडेना‎

शहरात एवढ्या माेठ्या प्रमाणात‎ उंट आढळल्याने त्याची चाैकशी‎ करत या उंटांच्या मालकांचा शाेध‎ घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी‎ दिले होते. मात्र आठवडाभराचा‎ कालावधी उलटला तरी अद्याप‎ मालक सापडलेले नसल्याने‎ आश्चर्य व्यक्त होत आहे.‎

आहार-विहाराचाही‎ उंटांवर परिणाम‎

वातावरण, भाैगाेलिक परिस्थिती हे‎ कारण तर आहेच. मात्र त्यांच्या‎ आहार आणि विहारातही मोठ्या प्रमाणात बदल झाला. काही उंटांच्या‎ छातीमध्ये इन्फेक्शनही झाल्याची‎ शक्यता आहे. तसेच खूप चालणे,‎ काही उंटांचे वय हाेणे अशी काही‎ कारणेही या उटांच्या मृत्यूमागे‎ असल्याची प्राथमिक शक्यता आहे.‎ - डाॅ. सचिन वेंदे, पशुधन विकास‎ अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय‎ सर्वचिकित्सालय, नाशिक‎