आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात अालेल्या मुख्य परीक्षेला २३२ उमेदवारांनी हजेरी लावली. १६ जण गैरहजर राहिले. आयोगाच्या वतीने महाराष्ट्र कृषी सेवेची पूर्वपरीक्षा यापूर्वीच घेण्यात आली होती.
त्याच वेळी मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार ही शनिवारी (दि. १३) नाशिकमध्ये एका केंद्रावर परीक्षा पार पडली. दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये पहिला पेपर हा सकाळी ११ ते १२ या दरम्यान घेण्यात आला तर दुसरा पेपर हा दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान घेण्यात आला. या परीक्षेसाठी एकूण २४८ विद्यार्थी नाशिकमध्ये पात्र ठरले होते. परंतू दोन्ही पेपरला प्रत्येकी १६ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. त्यामुळे दोन्ही पेपरला प्रत्येकी २३२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावत परीक्षा दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.