आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:माजी जिल्हाध्यक्ष काेंबडेंची मनसेत‎ घरवापसी; शहराध्यक्षपदासाठी चर्चा‎, सलीम शेख यांच्याकडे कामगार सेनेची धुरा‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या ‎ ‎ राजीनाम्यानंतर पक्षात नव्याने इनकमिंग सुरू‎ झाले असून माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी ‎ ‎ नगरसेवक सुदाम काेंबडे यांनी पक्षाध्यक्ष राज‎ ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी केली.‎ दरम्यान, काेंबडे यांना शहराध्यक्षपदी बढती‎ देण्याची शक्यता आहे.‎

मनसेतून भाजपत गेलेले काेंबडे यांचा सुदाम ‎ ‎ डेमसे यांनी पालिका निवडणुकीत पराभव ‎ ‎ केल्यानंतर ते राजकीय विजनवासाचा सामना‎ करत हाेते. मात्र, दातीर यांचे शहराध्यक्षपद ‎ ‎ गेल्यानंतर शहराचा अनुभव असलेले अाणि पूर्वी ‎ ‎ ग्रामीण जिल्हाध्यक्षपद भूषविलेले सुदाम काेंबडे ‎ यांनी मनसेत घरवापसी केली.

त्यांच्यासह‎ इंदिरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप ‎ जगझाप, गणेशवाडीतील भूषण शिरसाठ,‎ कुणाल देवरे यांनीही मनसेत प्रवेश केला. यावेळी ‎ ‎ मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक,‎ प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, पराग‎ शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, कामगार सेनेचे ‎ ‎ प्रदेश उपाध्यक्ष सलीम (मामा) शेख, जिल्हा ‎ ‎ उपाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनोज घोडके‎ आदी उपस्थित हाेते.

‎ दरम्यान मनसे साेडून अन्य पक्षांत गेल्यानंतर ‎ ‎ज्यांची वाताहात झाली, असे अनेक माजी ‎ ‎ नगरसेवक वा पदाधिकारी आता पुन्हा पक्षाच्या ‎ ‎ वाटेवर असल्याचे बाेलले जाते.‎ मनसे कामगार सेना अध्यक्षपदाचे पत्र सलीम शेख यांनाे देण्यात आले.‎

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे‎ नगरसेवक सलीम मामा शेख‎ यांची महानगरपालिका‎ कर्मचारी कामगार सेनेच्या‎ नाशिक अध्यक्षपदी निवड‎ झाली यावेळी मनसे नेते‎ संदीप देशपांडे, दिलीप दातीर,‎ नगरसेवक योगेश शेवरे, शहर‎ उपाध्यक्ष सचिन सिन्हा,‎ संतोष शहाणे, सरचिटणीस‎ अमित गांगुर्डे, संजय देवरे,‎ विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष‎ संदीप भवर , माथाडी‎ कामगार सेनेचे चिटणीस‎ वैभव महिरे आदी पदाधिकारी‎ उपस्थित होते.‎

मुर्तडक यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद?‎

माजी महापाैर अशाेक‎ मुर्तडक हे जुनेजानते असून‎ त्यांचा राजकीय अनुभवही‎ माेठा अाहे. ही बाब लक्षात‎ घेता त्यांच्याकडे‎ शहराध्यक्षपदाची जबाबदारी‎ देण्यासाठी एक गट अाग्रही‎ असल्याचे समजते. त्यातून‎ पक्षात निष्ठावंताना न्याय‎ मिळताे हाही संदेश जावू‎ शकताे असाही दावा केला‎ जात आहे.‎