आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय:MIDC चे सांडपाणी‎ घेण्यास पालिकेचा नकार‎, निरीला पाठवला अहवाल; अमृत याेजना प्रकल्प अडचणीत‎

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक‎ एमआयडीसीतील सांडपाण्याची‎ विल्हेवाट महापालिकेने आपल्या‎ मलनिस्सारण केंद्रांमार्फत लावावी या‎ बहुचर्चित मागणीवर अमृत दोन‎ योजनेंतर्गत तोडगा काढण्याच्या‎ हालचाली सुरू असताना महापालिकेने‎ आता एमआयडीसीतून बाहेर‎ पडणाऱ्या सांडपाण्यात घातक‎ केमिकल असल्यामुळे आमच्या‎ मलनिसारण केंद्रांच्या क्षमतेवर परिणाम‎ हाेईल असा दावा करत हे पाणी‎ स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसा‎ अहवलाच ‘निरी’ या संस्थेला सादर‎ केला जाणार आहे.‎

सातपूर व अंबड औद्योगिक‎ वसाहतीत गंगापूर धरणातून‎ पाणीपुरवठा केला जातो. उद्याेगांनी‎ वापरलेले पाणी इकडे-तिकडे सोडले‎ गेल्यास ते पुन्हा नदीपात्रात येऊन प्रदूषण‎ वाढते. अनेक लहान माेठ्या नाल्यांद्वारे‎ हे पाणी गाेदावरी व अन्य उपनद्यांमध्ये‎ आल्याचेही दिसून आले. त्यामुळे‎ गोदावरी गटारीकरणविराेधी मंचने‎ न्यायालयात केलेल्या दाव्यात या‎ पाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न‎ अनेकवेळा चर्चेत आला.

मुळात,‎ उद्याेगांसाठी वापर हाेऊन बाहेर‎ पडणाऱ्या सांडपाण्यावर शास्त्रीय‎ पद्धतीने प्रक्रिया करून विल्हेवाट‎ लावण्याची जबाबदारी महाराष्ट्र‎ औद्योगिक विकास महामंडळाची‎ आहे. मात्र आपल्याकडे यंत्रणा‎ नसल्यामुळे ही जबाबदारी‎ महापालिकेने घ्यावी अशी अनेक वर्षांची मागणी होती.

उद्योजकही‎ त्यासाठी आग्रही होते. दरम्यान, याप्रकरणी उद्योगमंत्री उदय‎ सामंत यांच्याकडे बैठक झाल्यानंतर त्यांनी औद्योगिक‎ सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी अमृत-२ योजनेंतर्गत सविस्तर‎ प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्या‎ अनुषंगाने महापालिकेकडून सल्लागार नियुक्ती केली जाणार‎ आहे. त्यासाठी २.१६ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात‎ आली आहे.

नकार देण्याच्या हलचाली सुरू

औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात‎ आल्यानंतर ते पालिकेच्या मलनिसारण केंद्रांस अाणण्यास‎ तांत्रिक कारणास्तव नकार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या‎ आहेत. उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात‎ केमिकलयुक्त, जड धातू आहेत.

तसेच, मलजल वाहिनीला‎ जोडल्या जाणारे औद्योगिक सांडपाण्यात सल्फेटचे उच्च‎ प्रमाण असून सल्फेटचे सल्फाइडमध्ये रूपांतर होऊन‎ हायड्रोजन सल्फाइड तयार होऊन सीवर नेटवर्क पाइपलाइन‎ खराब होऊ शकतात अशी भीती आहे. त्यामुळे उद्याेगांसाठी‎ अमृत दोन योजनेतून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा राहिला‎ तरी हे पाणी कोठे सोडायचे हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे.‎