आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक अपघातांच्या गुन्ह्यात अपघातग्रस्ताचे, अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नातेवाइक किंवा तेही नसतील तर प्रथमदर्शनी व्यक्तीची फिर्याद घेतली जाऊन अपघाताचे गुन्हे दाखल केले जात होते. मात्र, अाता हे गुन्हे उघडकीस येण्यासाठी पंचनामा करणाऱ्या पोलिसांचीच फिर्याद घेण्याच्या सूचना पोलिस अायुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या अाहे.
अपघातांचा गुन्हा दाखल करण्यासाठी एकतर फिर्यादीच काेणी नसते किंवा नातेवाइकांनी वा इतर काेणी गुन्हा दाखल केलाच तर अाराेपीकडून ताे मागे घेण्यासाठी दबाब टाकला जातो. यामुळे हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण घटत असल्याने संबंधित पोलिस ठाण्याचा कर्मचारीच अाता फिर्यादी असणार अाहे. अपघाताचा गुन्हा घडल्यानंतर फिर्यादी अाणि तपासी अधिकारी यांच्या तपासात नुकसानग्रस्त व्यक्तीला न्याय मिळणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत अाहे.
अशी होती पूर्वीची प्रक्रिया
अपघात घडल्यानंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळावर पंचनामा करून प्रत्यक्षदर्शी अथवा अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवाइकाची फिर्याद घेत होते. अपघाताच्या गुन्ह्याचा तपास हवालदार ते उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी करत होते. फिर्यादी वेळेअभावी उपलब्ध नसल्याने तपासात विलंब होतो. यामुळे दोष सिद्ध होण्यास वेळ लागतो.
अपघातग्रस्तांना न्याय अपगातातील मयत वा नातेवाइकाला फिर्यादीला अपघाताची कल्पना नसते. दोषारोप सिद्ध करताना अडचणी येतात. अपघातांच्या गुन्ह्यात अाता पोलिस कर्मचारीच फिर्याद देतील. त्यामुळे मदत हाेऊन अपघातग्रस्ताला न्याय मिळेल. - अंकुश शिंदे, अायुक्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.