आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावारकऱ्यांची माेठी संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने शासकिय वारकरी महामंडळाची स्थापना करण्यासह वारकऱ्यांना माेफत विमा संरक्षण, प्रत्येक जिल्हयात वारकरी भवन, शासनाने जाहीर केले. पाच हजार रूपयांचे मासिक मानधन वितरीत करण्यासह सर्व पालख्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासारख्या महत्वपूर्ण नऊ विषयांचे ठराव उद्या राज्यातील पहिल्या जिल्हास्तरीय वारकरी संमेलनात नाशिकमध्ये मांडले जाणार आहेत.
राज्यात पहिल्यांदाच, नाशिकमध्ये जिल्हास्तरीय वारकरी स्नेहसंमेलनाचे आयाेजन करण्यात आले असून किमान 5 हजार वारकरी यात सहभागी हाेणार आहेत. पंचवटीतील श्रीराम सार्वजनिक वाचनालय पटांगण, गणेशवाडी येथे हे एक दिवसीय स्नेहसंमेलन हाेणार असून माजी आमदार बाळासाहेब सानप याचे स्वागताध्यक्ष आहेत, उद्या रविवार, 8 जानेवारी राेजी सकाळी 8 वाजता संमेलनाला प्रारंभ हाेणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ.भागवतराव कराड यांची प्रमुख उपस्थिती असेल तर आमदार श्रीकांत भारतीय हयांच्या उपस्थितीत संमेलनाचा सांगता समाराेह हाेईल.
पहिल्या सत्रात श्री संत तुकाराम महाराज विद्यार्थी गुरूकुल व वृध्दसेवा सदन नाशिकचे हरि किर्तन प्रवक्ते ह. भ.प.गंगाधर महाराज कवडे यांचे मार्गदर्शन हाेईल. दुसऱ्या सत्रात शहरातील वारकरी संप्रदायिक कार्यक्रमातील अडचणी, वारकरी प्रवचन, किर्तनकार, कथाकार यांच्या समस्या व त्यावर शासन दरबारी पाठपूरावा कसा करता येइल? यावर मंथन केले जाणार असल्याची माहीती संमेलनाचे स्वागताेत्सुक ह.भ.प. त्र्यंबकराव गायकवाड, ह.भ.प.पुंडलिकराव थेटे आदींनी दिली.
संमेलनात मांडले जाणारे प्रमुख ठराव असे -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.