आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Water Cut Avoidedपाणी कपात टळली; अतिरिक्त‎ 200 दलघफू जलसंपदाकडून‎, कपातीचा निर्णय जूनमध्ये‎, आता 15 ऑगस्टपर्यंत पुरणार पाणी‎

आनंदवार्ता:पाणी कपात टळली; अतिरिक्त‎ 200 दलघफू जलसंपदाकडून‎, कपातीचा निर्णय जूनमध्ये‎

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक‎ राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशानुसार अल निनोमुळे पाऊस‎ लांबल्यास ३१ ऑॅगस्टपर्यंत पाणी‎ पुरवठा करण्यासाठी एप्रिल व मे‎ महिन्यात आठवड्यातून एक दिवस‎ पाणी कपात करण्याबाबत‎ महापालिका अायुक्त डाॅ. चंद्रकांत‎ पुलकुंडवार यांच्या प्रस्तावावर ते‎ महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी‎ गेल्यानंतरही निर्णय झाला‎ नसल्यामुळे सुरू असलेली‎ घालमेल थांबली आहे.

पालकमंत्री ‎ ‎ दादा भुसे यांनी घेतलेल्या‎ अाढाव्यानंतर महापालिकेला २०० ‎ ‎ दशलक्ष घ‌नफूट वाढीव पाणी‎ देण्याची तयारी जलसंपदा विभागाने ‎ ‎ दाखवल्यामुळे अाता शहरासाठी १५ ‎ ‎ ऑगस्टपर्यंत पाणी पुरणार आहे. ‎ ‎ त्यामुळे तूर्तास मे महिन्यात हाेणारी‎ पाणी कपात टळली असून जून व‎ जुलै महिन्यात गरजेनुसार पाणी‎ कपात केली जाईल अशी माहिती‎ अधीक्षक अभियंता शिवाजी‎ चव्हाणके यांनी दिली.‎

पाणीकपात नक्की कशासाठी?

अल निनाेच्या संकटामुळे जून व‎ जुलै महिन्यात पाऊस अाेढ देऊ‎ शकतााे, अशी शक्यता हवामान‎ खात्याने व्यक्त केली हाेती. त्यानंतर‎ राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव‎ मनुकुमार श्रीवास्तव यांनी पाण्याच्या‎ नियोजनाचे आदेश दिले हाेते.‎ आयुक्त डाॅ. पुलकुंडवार यांनी‎ एप्रिल व मे महिन्यात‎ आठवड्यातून एक दिवस तर जून‎ व जुलै महिन्यात आठवड्यातून‎ दाेन दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव‎ दिला हाेता.

साधारणपणे‎ धरणातील पाणी आरक्षण हे ३१‎ जूलैपर्यंतचा विचार करून केलेले‎ असते. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी एप्रिल व मे‎ महिना मिळून नऊ दिवस कपात‎ केलेले पाणी पुढे वापरता येईल.‎ तसेच जून व जुलैत आठवड्यातून‎ दाेन दिवस याप्रमाणे साधारण १८‎ दिवसाचे असे २७ दिवसांचे पाणी‎ वाचवणे शक्य हाेते.

या प्रस्तावाचे‎ काैतुकही झाले मात्र‎ पालिकास्तरावर अंतिम निर्णय‎ झाला नव्हता. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तीन‎ वेळा बैठक बाेलावली मात्र, काही‎ ना काही कारणामुळे बैठक‎ लांबणीवर पडली. दरम्यान, मे‎ महिना सुरू झाल्यानंतरही कपात‎ हाेत नसल्यामुळे पावसाने अाेढ‎ दिली तर पुढे काय करायचे असा‎ प्रश्न हाेता.

पाण्याचा प्रश्न सध्या निकाली

अखेरीस पालकमंत्री‎ दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी‎ कार्यालयात अाढावा घेतल्यानंतर‎ त्यात जलसंपदाने वाढीव २००‎ दशलक्ष घनफूट पाणी दिल्यास ३१‎ जुलैनंतर पुढील १५ दिवसाचा प्रश्न‎ निकाली निघेल. उर्वरित १५‎ दिवसाचा कालावधी भरून‎ काढण्यासाठी जून व जुलै‎ महिन्यात अाठवड्यातून दाेन दिवस‎ पाणी बंद ठेवले तर कसर भरून‎ निघेल, असे अभियंता चव्हाणके‎ यांनी सांगितले.‎

पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत पालिकेला २०० दशलक्ष घनफूट‎ अतिरिक्त पाणी जलसंपदा विभाग देणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल. त्यापुढील १५ दिवसांच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार‎ आहे. मात्र जून-जुलै महिन्यात किती पाऊस पडतो. त्याचे पावसाचे‎ प्रमाण बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. - शिवाजी चव्हाणके,‎ अधीक्षक अभियंता, महापालिका, नाशिक‎

कपातीचा निर्णय जूनमध्ये‎

२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले‎ तर पालिकेचे वार्षिक पाणी‎ आरक्षण ६ हजार दशलक्ष घनफूट‎ इतके हाेईल. यापुर्वी ५८०० दशलक्ष‎ घनफूट पाणी आरक्षण मंजूर हाेते.‎

ऑगस्टपर्यँत् पाणी पुरेल

आवश्यकता वाटल्यास जुलै महिन्यात कपातीचा निर्णय‎ घेण्यात येणार आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी आहे.‎ शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेलही‎ चार्ज आहेत. जरी पाऊस लांबला तरीही ३१‎ ऑगस्टपर्यंत पाणी मिळू शकेल असे चित्र‎ सध्या तरी उपलब्ध पाणीसाठ्यांवरून‎ दिसत आहे. तरीही आवश्यकता वाटल्यास‎ जुलैमध्ये पाणी कपातीबाबत निर्णय घेता‎ येईल. - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक‎ पावसाचे प्रमाण बघून पुढील नियोजन करावे लागेल‎