आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎रंगपंचमी:तिवंध्याच्या रहाडीत नैसर्गिक पिवळा, जुनी तांबट लेनमध्ये केशरी रंग‎

नाशिक‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाेळीच्या पाचव्या दिवशी शहरात‎ रंगपंचमीचा उत्सव असताे. या‎ रंगपंचमीचे खास आकर्षण असते ते‎ रहाडीमध्ये रंगाेत्सव खेळण्याचे. ३०० वर्षे‎ जुनी पेशवेकालीन पंरपरा आजही या‎ रहाडीच्या माध्यमातून जपली जात आहे.‎ शहरातील ७ रहाडींपैकी ५ रहाडी खुल्या‎ केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे या‎ सर्व रहाडींमध्ये पूर्णमध्ये नैसर्गिक‎ रंगाचाच वापर केला जाताे. यंदा तिवंधा‎ येथील रहाडीत पिवळा तर जुनी तांबट‎ लेनमध्ये केशरी रंगाचा वापर केला‎ जाणार आहे.‎ पेशवेकालीन रहाड उत्सवामुळे‎ राज्यभरात नाशिकची एक वेगळी‎ आेळख निर्माण झाली आहे.

शहरात‎ एकूण सात रहाडी आहेत. त्यापैकी दाेन‎ बंद असून पाच रहाडी खुल्या केल्या‎ जातात. तिवंधा चाैकातील रहाड १२ फूट‎ खाेल आणि १० फूट रुंद आहे. रहाडीत‎ पळसाच्या पानापासून पिवळा रंग तयार‎ केला जाणार आहे.तर शनी चाैकातील‎ रहाड १२ फूट खाेल आणि १२ फूट रुंद‎ असून या रहाडीत गुलाबी रंगाचा वापर‎ केला जाताे. जुनी तांबट लेन येथे‎ असलेल्या रहाडीत फुलांचा वापर करून‎ केशरी रंग तयार केला जाताे. रंगपंचमीला‎ दिवशी मंत्राेच्चार व पूजा केल्यानंतर या‎ रहाडीत तरुणाईसह आबालवृद्ध मनसाेक्त‎ उड्या मारत रंगाेत्सवाचा आनंद घेतात.‎

रहाडीच्या पाण्यात उडी‎ मानले जाते आराेग्यदायी पूर्णत: नैसर्गिक रंगाचा वापर रहाड रंगाेत्सवासाठी केला‎ जाताे. पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून‎ चार ते पाच तास एका भांड्यात गरम करून ठेवत रंग‎ तयार केला जाताे. हा रंग असलेल्या रहाडीचा पाण्यात‎ उडी मारल्यास काेणत्याही प्रकारचा त्वचाराेग हाेत नाही‎ असे सांगितले जाते.‎

पळसाच्या फुलाचा वापर‎
तिवंधातील रहाड ही ३०० वर्षांपेक्षा‎ ‎ जुनी आहे. यंदा‎ ‎ रंगासाठी‎‎ ‎ पळसाच्या‎ ‎ फुलांचा वापर‎ ‎ केला जाणार‎ ‎ आहे.‎ ‎ - मयूर‎ भालेराव, अध्यक्ष, हिंदमाता सेव‎ मंडळ‎

बातम्या आणखी आहेत...