आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आश्वासन,‎ शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित‎

चांदवड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ कांदा, द्राक्ष व इतर भाजीपाला‎ शेतीमालास योग्य बाजारभाव‎ मिळण्यासह शेतकऱ्यांच्या विविध‎ मागण्यांसाठी येथील बाजार समितीत‎ सुरू केलेले उपोषण केंद्रीय आरोग्य‎ राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या‎‎ आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी‎ शनिवारी (दि. ४) सायंकाळी तात्पुरत्या‎ कालावधीसाठी स्थगित केले.‎ केंद्र व राज्य सरकारने कांद्याला तीन‎ हजार रुपये हमीभाव द्यावा, आजपर्यंत‎ विक्री झालेल्या कांद्याला प्रतीक्विंटल‎ १५०० रुपयेप्रमाणे अनुदान द्यावे, यासह‎ शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी‎ माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या‎ मार्गदर्शनाखाली येथील बाजार समितीत‎ शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. ३) उपोषण‎ सुरू केले होते. शनिवारी शासकीय‎ अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट‎ घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केली होती.

मात्र मागण्यांबाबत ठाम‎ रहात उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू‎ ठेवले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी‎ शनिवारी सांयकाळी ४ वाजता केंद्रीय‎ राज्यमंत्री डॉ. पवार, पुणे येथील‎ राज्याचे पणन संचालक विनायक‎ कोकरे, माजी पणन संचालक सुनिल‎ पवार, जिल्हा उपनिबंधक सतिश खरे‎ यांनी फोनद्वारे उपोषणकर्त्यांशी चर्चा‎ करुन व उपविभागीय अधिकारी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप‎ पाटील, पोलिस निरीक्षक समीर‎ बारवकर, सहायक निबंधक सविता‎ शेळके, चांदवड बाजार समितीचे‎ प्रशासक अनिल पाटील यांनी‎ उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या‎ मागण्यांबाबत चर्चा करून उपोषण मागे‎ घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय‎ राज्यमंत्र्यांनी सरकार तुमच्या‎ मागण्यांसंदर्भात योग्य तो विचार करत‎ असून तुम्हाला योग्य न्याय मिळवून‎ देण्याची जबाबदारी घेत असल्याचे‎ सांगितले.

रविवार ते मंगळवार या‎ तिनही दिवशी सरकारी कामकाजाला‎ सुट्टी आली असता सरकारला आमच्या‎ मागण्यांसंदर्भात विचार करायला वेळ‎ मिळावा म्हणून उपोषण स्थगित करत‎ असल्याचे माजी आमदार शिरीषकुमार‎ कोतवाल यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष‎ संजय जाधव यांनी मागण्यांबाबत‎ विचार न झाल्यास पुन्हा उपोषण‎ करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी‎ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे,‎ भीमराव जेजुरे, शिवाजी कासव, विजय‎ जाधव, संपतराव वक्ते, समाधान‎ जामदार, अ‍ॅड. अन्वर पठाण, दत्तू‎ ठाकरे, विजय कुंभार्डे, भीमराव‎ निरभवणे, दीपांशू जाधव, बापू शिंदे,‎ किसनराव जाधव, पप्पू कोतवाल,‎ पंकज दखने, बाळासाहेब शिंदे, कैलास‎ कोतवाल, नंदू कोतवाल आदींसह‎ शेतकरी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...