आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांधकामाचे प्रकल्प उभारताना त्या ठिकाणी याेग्य त्या सुरक्षतेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने अनेक दुर्घटना घडत असून परिसरातील रहिवाशांनाही धुळीचा त्रासााला सामाेरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेत मनपा आयुक्तांनी तातडीने उपाययाेजना न करता बांधकाम करणाऱ्यांविराेधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकंुडवार यांनी बुधवार (दि. १) परिपत्रक काढून अटीशर्तींचे पालन करण्याबाबतच्या विविध सूचना नगरनियोजन विभागाचे उपसंचालक, सहाय्यक संचालक तसेच कार्यकारी अभियंत्यास दिल्या आहेत. मनपा हद्दीत कोणत्याही बांधकाम मनपाची बांधकाम परवानगी व कमेसमेन्ट सर्टिफिकेट देताना विविध अटी-शर्ती नमूद करण्यात येतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे व सभोवतालच्या परिसरात धूळ, कचऱ्याचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बांधकामाच्या ठिकाणी हिरवी जाळी बसविण्याची अट टाकण्यात आली आहे.
परंतु, शहरातील काही भागांमध्ये सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना केलेली दिसून येत नाही. त्याअनुषंगाने आयुक्तांना परिपत्रक जारी करत उपाययोजना न करणाऱ्या विकासकासह बांधकाम करणाऱ्या घरमालकांविराधात अटीशर्तींचे पालन केले जात नसल्याची शहानिशा करण्याची सूचना आयुक्तांनी नगरनियोजन विभागाला केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.