आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:किल्ले संवर्धनासाठी‎ 351 ध्वजांची सलामी, 6 जूनला रायगडावर पार पडणार शिवराज्याभिषेक साेहळा‎

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांनी‎ स्वराज्य स्थापनेसाठी दिलेला लढा, गड-किल्ल्यांची केलेली स्थापना हा इतिहास आजच्या पिढीला माहिती‎ व्हावा यासाठी सिंहगर्जना युवा‎ मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात‎ आला आहे. मंचच्या वतीने ‎शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‎रायगडावर ३५१ ध्वजांची सलामी‎ दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे,‎ प्रत्येक ध्वजावर शिवाजी महाराजांनी‎ जिंकलेला वा बांधलेल्या किल्ल्यांचे‎ नाव असणार आहे. सोहळ्यानंतर‎ हेच ध्वज राज्यात ३५१ ठिकाणी‎ वितरीत केले जाणार आहे.‎

राज्याभिषेक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०‎ वा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून‎ दुर्गराज रायगडावर पार पडणार आहे.‎ ३५० वा सोहळा असल्याने यंदा हा‎ जल्लोषात व लाखो शिवभक्तांच्या‎ उपस्थितीत पार पडणार आहे.
या‎ सोहळ्यासाठी देश-विदेशातून‎ शिवराज्यभिषेकसाठी शिवप्रेमी‎ रायगडावर उपस्थित राहतात.‎ नाशिकचे विश्वविक्रमी पथक म्हणून‎ ओळख असलेली नाशिकची गर्जना‎ सिंहगर्जना दरवर्षी रायगडावर वादन‎ स्वरूपात शिवराज्याभिषेक दिनी‎ सेवा पुरवते.‎

351 किल्ल्यांची नावे ध्वजावर

यावर्षीदेखील ३५० वा‎ शिवराज्याभिषेक दिन औचित्य‎ साधून ३५१ भगव्या ध्वजांची‎ शिवप्रेमी हस्ते सलामी देणार असून‎ ३५१ किल्ल्याची नावे ध्वजांवर‎ लिहिलेली असणार आहे.‎ रायगडावर जो शिवप्रेमी हा ध्वज‎ सलामी देणार तोच शिवप्रेमी हा ध्वज‎ घेऊन आपल्या घरी परतणार असून‎ या माध्यमातून ३५० वा‎ शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या‎ पार्श्वभूमीवर ३५१ महाराष्ट्रातील‎ विविध ३५१ भागात ध्वज जातील.‎ शिवभक्त महाराष्ट्रामधील विविध‎ शहर, गाव अशा ३५१ ठिकाणी ध्वज‎ पोहोचवण्याचे नियोजन करण्यात‎ अाले आहे.

ध्वजावर लिहिलेल्या‎ किल्ल्याचे नाव त्याचा इतिहास‎ त्याचा प्रचार, प्रसार व अविस्मरणीय‎ सोहळा हा कायमस्वरूपी‎ आठवणीत रहावा, गडकिल्ले‎ संवर्धनाला हातभार लागावा या‎ दृष्टीने सिंहगर्जना युवा मंचने‎ नियोजन केले आहे.‎ या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती‎ संभाजीराजे, युवराज्ञी संयोगीताराजे‎ छत्रपती व हेमंत साळुंखे यांचे‎ मार्गदर्शन लाभत आहे.‎

जनजागृतीचा प्रयत्न‎
‎ ३५० वा‎ ‎ शिवराज्याभिषेक‎ ‎सोहळ्याचे‎ औचित्य‎ साधत‎ शिवगर्जना युवा‎ ‎ मंचच्या वतीने‎ ३५१ ध्वजांची सलामी दिली जाणार‎ आहे. या माध्यमातून गड-किल्ले‎ संवर्धनाबाबत जनजागृती हाेण्यास‎ देखील मदत होणार आहे. - प्रीतम‎ भामरे ,संस्थापक अध्यक्ष,‎ सिंहगर्जना युवा मंच महाराष्ट्र‎