आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामटवाडेतील इंद्रनगरी परिसराचा गेल्या अनेक दिवसांपासून बिकट बनलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. याबाबत माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सतत पाठपुरावा केल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार करीत आभार मानले.
इंद्रनगरी परिसरात-गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे महिलावर्गास खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना तर पाण्यासाठी कसरतच करावी लागत होती. महापालिका प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या करूनही काही उपयोग न झाल्याने शिवसेना विभागप्रमुख पवन मटाले, साधना मटाले यांनी परिसरातील या प्रश्नांत लक्ष घालून तो तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे साकडे बडगुजर यांना घातले असता त्यांनी आधिकाऱ्यांशी संपर्क साधून जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा मार्गातील दोष तातडीने दूर केला.
त्यामुळे आता या परिसरात नियमित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी शाखा प्रमुख रोहित शिंदे, जितेंद्र भालेराव, राजेंद्र सुतार, सुभाष शुकले, दिनेश तेली, डॉ.शरद बगडाने, उज्ज्वला अहिरे, पूनम महाजन, संगीता घाडगे, विजया शिरोडे, मीना पाटील, ललित पवार, कमिका गवळी, आशा सोनवणे, मीरा क्षीरसागर, मंगला शिंदे, स्वाती सोनी, हर्षदा पाटील, उषा महाजन, मंगला महाजन, सुप्रिया घाडगे, शिवानी घाडगे, पल्लवी अहिरे, दीपा पटेल आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.