आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:शेतकरी हिताचे धोरण न आखणाऱ्या सरकारला आपल्याला बाजुला करावे लागेल - शरद पवार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ते निर्यातीला प्रोत्साहन देत नाहीत तर आयातीला प्रोत्साहन देतात. शेतीमालाला चांगली किंमत दिली पाहिजे, बी बियाणे, पाणी दिले पाहिजे मात्र हे काम करण्यासाठी सरकार दुर्लक्ष करत आहे. शेतकरी हिताचे धोरण न आखणाऱ्या या सरकारला आपल्याला बाजुला करावे लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

देवरगाव येथे आदिवासी आश्रम शाळा इमारत व मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत हाेते. आदिवासी लोकांना आश्रमशाळा हवी, वीज आणि पाणी हवे यासाठी आमदारांनी निधी मंजुर करून आणला असून लवकरच या ठिकाणी आश्रमशाळा देखील उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी अधिक लक्ष देण्याची गरज : छगन भुजबळ
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शरद पवार यांनी राज्याच्या बजेटमध्ये 9 टक्के निधीची तरतूद कायम केली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. असे असले तरी आजही काही प्रमाणात आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले. आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी आश्रम शाळा वसतीगृह अतिशय महत्वाचे आहे. आदिवासींचे शिक्षणाचे प्रश्न सोडविले तर हा समाज व्यवस्थेत पुढे येऊ शकतो त्यामुळे आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

जनतेचे प्रश्न साेडून मुख्यमंत्री अयाेध्या दाैऱ्यावर

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांद्या अनुदानातील अटी अधिक असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यासाठी शासनाकडे आम्ही वेळाेवेळी मागणी केली आहे. जनतेचे प्रश्न प्रलंबित असताना अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील मंत्री परत आले की त्यांना पुन्हा एकदा सांगू अशी टीका भुजबळ यांनी यावेळी केली.