आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलांना असंख्य प्रकारच्या जंतूंमुळे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. मुलांची रोगप्रतिकारशक्ती विकसनशील अवस्थेत असते आणि गंभीर आजारांशी लढा देणे त्यांना शक्य नसते, अशा वेळी लसीकरण हा एक सर्वाधिक यशस्वी मार्ग असल्याचा दावा ज्येष्ठ बालराेग तज्ज्ञ डाॅ. शर्मिला कुलकर्णी यांनी केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यासारख्या आजारांमुळे होणारे सर्व वयोगटातील मृत्यू कमी करण्यासाठी लसीकरण सर्वाधिक यशस्वी ठरते. 6 इन 1 लसीकरणामुळे 6 गंभीर आजारांपासून मुलांचे संरक्षण होते. कॉम्बिनेशन वॅक्सिनेशन अधिक फायद्याचे ठरते. मुलांप्रमाणेच पालकांसाठीसुद्धा ही फार सोयीची बाब आहे. मुलांना कमी वेळा त्रास आणि दुखणे सहन करावे लागते.
इंडियन अकॅडमी ऑफ पिडिअॅट्रिक्सच्या लसीकरण वेळापत्रकानुसार, DTP-IPV-Hib-HepB ही लस मुलांना 6, 10 आणि 14 व्या आठवड्यात द्यायची असते. प्रत्येक वेळेला मुलांना फक्त दोन इंजेक्शन्स दिली जातील आणि एक तोंडावाटे देण्याची लसीशी एकत्रित लस नसल्यास मुलांना अधिक इंजेक्शन्स घ्यावी लागतील. महाराष्ट्रातील लसीकरण 73.5 टक्क्यांवरून 90 टक्क्यांपर्यंत वाढाविण्याची गरज असल्याचेही डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.