आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:यशवंतराव चव्हाण यांच्या‎ कार्यानेच राज्य अग्रेसर : भावे‎‎

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील,‎ कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे‎ यांच्यासारखी माणसे लाभली, त्यांनी‎ महाराष्ट्राची बांधणी केली. ३८ वर्षे यशवंतरावांनी‎ महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात कर्तृत्व व‎ वक्तृत्वाने नावलौकिक मिळविला. त्यांच्या‎ दूरदृष्टीपणामुळेच मोठी धरणे, औद्योगिक संस्था‎ आणि शिक्षण संस्था उभ्या राहू शकल्या, असे‎ प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.‎ यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त यशवंतराव‎ चव्हाण सेंटर व मविप्र संस्था यांच्या संयुक्त‎ विद्यमाने भावे यांचे ‘यशवंतराव चव्हाण आणि‎ त्यानंतरचा महाराष्ट्र'' विषयावर व्याख्यान पार‎ पडले. भावे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या‎ कार्यामुळेच देशात महाराष्ट्र अग्रेसर राहिला‎ आहे.

रोजगार हमी योजना, कसेल त्याची‎ जमीन, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, डोक्यावर‎ मैला वाहून नेण्यास बंदी, सहकाराची‎ पायाभरणी, एमआयडीसी, खासगी वाहनांचे‎ राष्ट्रीयीकरण करून राज्य परिवहन मंडळाची‎ (एसटी) स्थापना या महत्वाकांक्षी योजना‎ महाराष्ट्रात राबविल्या आणि यशस्वी करून‎ दाखविल्या. याच योजना केंद्र सरकारने नंतर‎ जशाच्या तशा उचलल्या. हा दूरदृष्टीपणा‎ यशवंतराव चव्हाण यांच्याकडे असल्यामुळेच‎ महाराष्ट्राने आतापर्यंत प्रगती केली आहे. ग्रामीण‎ भागातून मुख्यमंत्री व्हायला हवे, यासाठी त्यांनी‎ ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा‎ परिषदा मजबूत केल्या. याचा परिणाम म्हणून‎ महाराष्ट्र सुधाकर नाईक, विलासराव देशमुख‎ यांना मुख्यमंत्रिपदावर पाहू शकला.‎ अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण नाशिक‎ सेंटरचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे होते.‎ व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष‎ अॅड. भगीरथ शिंदे,नानासाहेब बोरस्ते, मविप्र‎ संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष‎ विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब‎ क्षीरसागर, अॅड. संदीप गुळवे उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...