आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअन्नाची नासाडी टाळणे, सकस आहार घेणे आणि शाश्वत जीवनशैली अंगीकारल्यास भूकमुक्त विश्वाची संकल्पना साकारू शकते, हा संदेश देण्यासाठी शहरातील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील गरजू व्यक्तींपर्यंत नेण्यात आले.
या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने अन्नदान केले. आजही अनेक व्यक्ती अर्धपोटी राहतात, तसेच अन्न किती महत्त्वाचे असते. हे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे जाणले. संस्थेचे संचालक सिद्धार्थ राजघरिया यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्या डॉ. पुष्पी दत्त यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.