आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालष्करी हद्दीपासून आता फक्त पन्नास मिटर अंतराचा भूखंड सोडून उर्वरित पन्नास मीटर अंतरावरील भूखंडावर प्लाॅटधारकांना बांधकाम करता येणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लष्कल हद्दीलगतच्या शंभर मिटरच्या आतील प्लॉटधारकांना दिलासा मिळणार आहे.
लष्कर हद्दीलगच्या शंभर ते पाचशे मीटर अंतरातील भूखंडावरील बांधकामाचा विषय मार्गी लागल्याच्या पाठोपाठ आता संरक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. देवळाली लष्कर कमांडरने तीन वर्षांपूर्वी दिलेल्या पत्रान्वये तत्कालिन पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीलगत असलेल्या शंभर मीटर हद्दीपर्यंत प्लॉटधारकांना कोणतेही बांधकाम करता येणार नाही. तसेच शंभर ते पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या प्लॉटधारकांना ४ मजल्यांपर्यंतच बांधकाम करता येईल, असे आदेश काढले होते.
या निर्णयामुळे लष्कर हद्दीलगतच्या शेकडो प्लॉटधारकांमध्ये असंतोष हाेते. याची दखल घेत लष्कर कमांडरचा निर्णय बदलण्यासाठी खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. शंभर ते पाचशे मीटर अंतरावरील भुखंडावर स्टील्ट न पकडता चार मजले किंवा पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना वर्षभरापूर्वी परवानगी मिळाली होती. असे असले तरी शंभर मिटरपर्यंतच्या भूखंडबाबतचा निर्णय प्रलंबित होता. आता लष्कर हद्दीपासून १०० मीटर अंतराच्या आतील भूखंडावर बांधकामाची अट काहीशी शिथिल करण्यात आली असून यापुढे फक्त ५० मीटरचे अंतर सोडावे लागणार आहे. उर्वरित ५० मीटर अंतरावरील भूखंडावर प्लाॅटधारकांना बांधकाम करता येणार आहे.संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लष्कर हद्दीलगतच्या हजारो शंभर मिटरच्या आतील प्लॉटधारकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.