आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भारतात गर्भवतींमधील मधुमेहाचे अधिक प्रमाण चिंताजनक‎

नीलेश अमृतकर |नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या जीवनशैलीने भारतातील गर्भवती‎ महिलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण अधिक‎ चिंताजनक ठरत आहे. भारतात २० टक्के गर्भवती‎ महिलांमध्ये मधुमेह हा गर्भधारणेतील गुंतागुंतीचे मुख्य‎ कारण ठरत आहे. त्यामुळे मधुमेह विशेषतः‎ महिलांसाठी धोकादायक आहे, कारण त्याचा परिणाम‎ महिलांच्या आरोग्यावर होतो. हृदयविकार, मूत्रपिंडाचे‎ आजार, अंधत्व, नैराश्य, मूत्रमार्गाचे संक्रमण‎ (यूटीआय) या आजारांसह गर्भपात होण्याचा धोका‎ संभावतो.

त्यामुळे मधुमेह असलेल्या गर्भवती‎ महिलांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच आैषधे घ्यावीत.‎ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आणि‎ संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे‎ अत्यावश्यक आहे, असा सल्ला आंतरराष्ट्रीय‎ मधुमेहतज्ज्ञ असाेसिएशनचे अध्यक्ष पद्मश्री डाॅ.‎ शशांक जाेशी यांनी दिला.‎ नाशिकमध्ये मधुमेहतज्ञांच्या‎ परिषदेसाठी आलेल्या डाॅ. जाेशी‎ यांनी दिव्य मराठीशी संवाद‎ साधला. ते पुढे म्हणाले की,‎ गर्भारपणात महिलांना खूप‎ खाण्याचा व खूप विश्रांतीचा आग्रह‎ धरू नये. ग्रामीण आणि शहरी‎ भागात मधुमेहाचे प्रमाण वाढत‎ आहे. यामागे केवळ जीवनशैली‎ हेच मूळ कारण असले तरी‎ त्याचबराबेर अनुवांशिकता हे एक‎ कारण आहे. आई वडिलांना‎ मधुमेह असेल तर ९० टक्के मुलांना‎ त्याची लागण हाेते. आई किंवा‎ वडिल दाेघांपैकी एकाला‎ असल्यास अशा कुटुंबियात ७०‎ टक्के आणि नातलगांना असल्यास‎ अशांना ४० टक्के मधुमेहाची‎ लागण हाेण्याची शक्यता असते.‎ जीवनशैलीतील बदल म्हणजे‎ सद्याच्या काळात जीवन जगणे‎ अधिक सुकर झाले आहे.

पुर्वीच्या‎ काळात शेतकरी शेतात काम‎ करायचे तर महिला घरी दळण‎ दळण्यासारखे कामे करायचे. मात्र‎ सद्यस्थितीत इलेक्ट्राॅनिक‎ तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माेबाईल,‎ लॅपटाॅपसारख्या उपकरणांमुळे‎ प्रत्येक व्यक्तीचे शारीरीक श्रम‎ कमी झाले आहे. सुस्त आणि मस्त‎ झालाे आहाेत. शारीरीक हालचाली‎ कमी झाल्याने आणि आहारात‎ देखील प्राेटीनची कमतरता‎ असल्याने पाेटाचा घेर वाढताेय.‎ पाेटाच्या चरबीमुळे चार आजार‎ उदभवतात.

मधुमेह, रक्तदाब,‎ काेलेस्ट्रालची समस्या,‎ हदयविकारचा धाेका अधिक‎ असताे. पुरूषांमध्ये ९० सेमीपेक्षा‎ जास्त आणि महिलांमध्ये ८० सेमी‎ पेक्षा जास्त पाेटाचा घेर असल्यास‎ त्याने नियमित तपासण्या केल्या‎ पाहिजेत. युवा पिढीमध्ये मधुमेहाचे‎ प्रमाण दहा वर्षांपूर्वी २ ते ५ टक्के‎ हाेते. तेच आता १२ ते १५ टक्क्यांवर‎ पाेहचले आहे. ताणतणाव, स्पर्धा,‎ जंकफूड, धूम्रपान हे कारणीभूत‎ आहे.‎

भारत ही मधुमेहाची काळजी घेणारा देश ठरेल‎
टाइप वनचा मधुमेह भारतात सर्वात जास्त आहे. भारत हा मधुमेह‎ रुग्णांची सर्वाधिक संख्या असणारा म्हणजेच मधुमेहाची राजधानी‎ ठरणार नाही तर काळजी घेणारा देश म्हणून त्याची ओळख निर्माण‎ करण्याचा मधुमेह तज्ज्ञांच्या परिषदेचा प्रयत्न आहे. नागरिकांनी‎ जागरूक राहिल्यास मधुमेह नियंत्रित राहू शकतो. - डॉ. शशांक जोशी,‎ अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मधुमेहतज्ञ असाेसिएशन‎

चीननंतर भारतात सर्वाधिक रुग्ण‎
मधुमेहाचे प्रमाण टाइप वन आणि टाइप टू अशा‎ दाेन प्रकाराचा मधुमेह असतो. भारत हा देश‎ दुसऱ्या क्रमांकावर असून पहिला क्रमांक चीनचा‎ लागताे. महाराष्ट्रात टाइप वनचा प्रकार वाढत‎ आहे. यात कायमस्वरूपी इन्सुलीन द्यावे लागते.‎ हा लहान मुलांना देखील हाेताे. आपल्या शरीरात‎ पांढऱ्या पेशीमधून अॅण्टीबाॅडी तयार हाेतात.‎

"एबीसीडीईएफ''चा‎ आरोग्यदायी मंत्र‎
ए -म्हणजे अॅव्हरेज साखर ६०‎ टक्क्यांपेक्षा खाली ठेवा, बी-‎ म्हणजे ब्लडप्रेशर १३० ते ८०‎ च्या खाली ठेवावे, सी- म्हणजे‎ एलडीएल काेलेस्टेराॅल खराब,‎ ७० च्या खाली असावे, डी-‎ म्हणजे डायट आहार- पाैष्टिक,‎ सकस असाव, जंक फूड,‎ चायनीज फूडपासून दूर ठेवावे.‎ ई- म्हणजे नियमित व्यायाम-‎ वय आणि शरीराप्रमाणे चालणे,‎ धावणे, सूर्यनमस्कार,‎ प्राणायाम, याेगासने एफ-‎ म्हणजे फूट, पायांची काळजी‎ घ्यावी.‎

अशी घ्यावी काळजी‎
खाण्यापिण्यावर नियंत्रण असायला‎ हवे.‎ किमान सात तास झाेप घ्यावी.‎ याेगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार‎ करणे गरजेचे आहे.‎ नियमित दिवसभरात ८ ते १० हजार‎ पावले चालावे.‎

बातम्या आणखी आहेत...