आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सामाजिक संस्थांच्या मदतीने विहीर खोदून भागवली तीन गावांची तहान;  नळांनाही पाणी

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘ती’ सकाळी झोपेतून जागी झाली की हंडा, कळशी घेऊन सरळ पाण्याच्या शाेधात निघायची... सात-आठ किलाेमीटरची पायपीट केल्यावर कुठेतरी दोन हंडे पाणी तीला मिळत असे. एवड्याशा पाण्यातच दिवस घालवायचा. पण आता मात्र तीची तहान पूर्ण भागली आहे. नदीकिनारीच विहीर खाेदली असून आता त्याला खूप खाेल पाणी लागले. सामाजिक संस्थांच्या मदतीने ते पाणी वर आणले आणि तीच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला.

पेठ तालुक्यातील डोंगरशेत, मोहाचा पाडा, चिरे-पाडा येथील आयाबायांना जेव्हा पाणी घरात आलं तेव्हा तो क्षण दिवाळीचा होता. या तीनही गावांतील महिलांना पाणी आणण्यासाठी सात-आठ किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. घरातील पाणी संपले की, पुन्हा तीच पायपीट. पाणी आणण्यातच या महिलांचा अर्धा दिवस जायचा. मग शेतीकामे होणार कशी, मुलंही पाण्यासाठी वणवण फिरायची. मग त्यांचा शाळेचा देखील प्रश्नच असायचा. यामुळे शिक्षणाचे नुकसान आणि घरातील महिलांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ अशा दुष्टचक्रात ही तीनही गावे अडकली होती.

आव्हानात्मक प्रकल्प हा प्रकल्प आव्हानात्मक होता कारण, याची उंची सुमारे ७३० फूट होती. प्रकल्प सर्वात कठीण भूभागांपैकी एकामध्ये राबविण्यात आला. ज्याची उंची २५० मीटर होती हे एक कठीण काम आहे जे गावकऱ्यांनी फत्ते केले. त्यासाठी आर्थिक हातभार एसएनएफ, ऑटोकॉम्प इंडिया आणि रोटरी क्लबने लावला. याकामात डॉ. श्रीया कुलकणी, मंगेश अपशंकर, विनायक देवधर, कमलाकर टाक आणि सुजाता राजेबहादूर, अॅड. मनीष चिंधडे उदयराज पटवर्धन यांनी विशेष पुढाकार घेतला.

अन‌् पाणी आले या तीनही गावकऱ्यांची एकी आणि श्रमदानातून दमणगंगा नदी तीरावर एक विहीर खोदण्यात आली. तीला खूप खोलवर पाणी लागले. मग विहिरीतील पाणी पाइपलाइन टाकून विजेवर चालणाऱ्या मोटारीद्वारे ते पाणी वर खेचत या पाड्यातील टाक्यांमध्ये सोडण्यात आले. टाक्यांना दुसऱ्या पाइपलाइनची जोडणी करत पाणी थेट नळांद्वारे ग्रामस्थांना मिळू लागले. या मुळे येथील १५००- १७०० ग्रामस्थांना पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली आहे. आता महिलांच्या वेळेची बचत होत असल्याने त्या आता आपला वेळ घरकामात आणि शेती कामात देऊ लागले आहेत.