आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:28 मे 2022 ला फरशा उखडून ठेवल्या; 5 काेटी रुपये‎ मंजूर हाेऊनही अभिनव भारत मंदिराची स्थिती दयनीयच‎

पीयूष नाशिककर |नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगावर रोमांच उभे करणाऱ्या‎ स्वातंत्र्यलक्ष्मीचे गीत लिहिणाऱ्या‎ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना‎ स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवात‎ वेळाेवेळी उजाळा दिला गेला.‎ त्याचवेळी नाशिकमधील‎ तिळभांडेश्वर लेनमध्ये स्वातंत्र्यवीरांनी‎ स्थापन केलेली स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती‎ मात्र केविलवाणी होऊन अभिनव‎ भारत मंदिराच्या हालअपेष्टा बघत‎ आहे. उखडलेल्या फरशा, तुटलेली‎ तावदाने आणि कोसळलेल्या भिंती...‎ हे दृश्य आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी‎ स्थापन केलेल्या अभिनव भारत‎ मंंदिराचे.‎ तिळभांडेश्वर लेन येथील अभिनव‎ भारत मंदिर ही वास्तू चांगली हाेती‎ असे म्हणावे लागेल. मात्र त्याच्या‎ नूतनीकरणाचा घाट घालण्यात आला‎ आणि यंत्रणेने वास्तूची दयनीय‎ अवस्था करून ठेवली आहे.

या‎ ठिकाणी पर्यटक आणि देशप्रेमींनी‎ यावे, वास्तू बघावी याचा प्रयत्न स्तुत्य‎ असला तरी सध्या ही वास्तू अखेरच्या‎ घटका माेजत आहे असे म्हटले तरी‎ वावगे ठरणार नाही. २८ मे २०२२ रोजी‎ स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती या‎ अभिनव मंदिरात साजरी झाली. मात्र‎ श्रेयवादाच्या नादात त्याच दिवशी या‎ वास्तूच्या नूतनीकरणास सुरुवात‎ झाली. त्यासाठी घाईघाईत‎ कार्यक्रमादरम्यानच येथील फरशा‎ उखडण्यासाठी कारागीर आले हाेते.‎ मात्र येथील नागरिकांनी येथे कार्यक्रम‎ आहे. ताे झाल्यावर काय करायचे ते‎ करा असे म्हटल्यानंतर कार्यक्रम‎ हाेताच येथील फरशा उखडण्यात‎ आल्या आहेत. मात्र त्यानंतर कामाचा‎ वेग मंंदावल्याने सर्वत्र गवताचेच‎ साम्राज्य पसरले आहे.‎‎

ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करूनच काम करावे...‎
अभिनव भारत मंदिर हे वीर सावरकरांच्या मालकीचे‎ आहे. येथे काम करण्याआधी या ठिकाणी असलेल्या‎ भाडेकरूंना विश्वासात घेतले पाहिजे. तसेच, ही जागा‎ शासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया करावी व त्यानंतरच‎ काम सुरू करावे. - शाहू खैरे, माजी नगरसेवक‎

अभिनव भारत मंदिराचे‎ काम लवकरच सुरू‎
अभिनव भारत मंदिराच्या‎ विकासकामासाठी राज्य‎ शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने‎ ‎ आधीच पाच‎ ‎ कोटी निधी‎ ‎ मंजूर केलेला‎ ‎ आहे. आता‎ ‎ पुन्हा १ कोटी‎ ‎ वाढवून घेण्यात‎ आला आहे. आर्किटेक्टकडून‎ नविन वास्तूची डिझाइन ही तयार‎ करण्यात आलेली आहे. लवकरच‎ कामांनाही सुरुवात केली जाणार‎ असून रुपडे पालटणार आहे.‎ - प्रा. देवयानी फरादे, आमदार‎

नूतनीकरणासाठी अशी तयारी सुरू‎
तिळभांडेश्वर लेनमधील या वाड्यात १८९९ ते‎ १९०९ या काळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर‎ सावरकरांचा मुक्काम होता. येथेच १९०४ मध्ये‎ स्वातंत्र्यदेवतेेची मूर्ती स्थापन करून सावरकरांनी‎ अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना‎ केली. या अभिनव मंदिराच्या संवर्धनासाठी राज्य‎ शासनाच्या पर्यटन खात्यातर्फे पाच कोटींचा‎ निधीही मंजूर करण्यात आला आहे.

निविदा‎ प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ठेकेदार नियुक्त‎ करण्यात आला आहे. वास्तुविशारद निनाद‎ बोथरा यांनी आराखडाही सादर केला आहे.‎ वाड्याची मूळ रचना कायम ठेवून बेसॉल्टचा‎ वापर करून हे नूतनीकरण करण्यात येणार आहे.‎ त्यासाठी येथील बाबाराव सावरकर सभागृहातील‎ दुर्मिळ छायाचित्रे आणि पुस्तके हलवण्यात आली‎ आहेत. त्यातून ग्रंथालय, प्रदर्शनी, शिल्पे‎ उभारण्यात येणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...