आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर भारतातील पश्चिम चक्रवातामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रावर होत असल्याने या राज्यांत किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घसरण झाली. येत्या दोन दिवसांत पारा हळूहळू घसरत जाणार असल्याने थंडीचा कडाकादेखील वाढणार आहे. आगामी दीड ते दोन आठवडे गारठा कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
विदर्भ व नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात थंडी अधिक जाणवेल. तामिळनाडूकडे येत असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या वातावरणाचा महाराष्ट्रातील थंडीवर काही परिणाम जाणवणार नसल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
आकाश स्वच्छ, निरभ्र
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यभरात गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा 20 ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत गेला. अशात गेल्या दोन दिवसांपासून आकाश स्वच्छ आणि निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यभरात कमाल तापमान हे 30 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. मात्र, आता तापमानात पुन्हा घसरण होत असून थंडी वाढताना दिसत आहे.
शेतकऱ्यांवरील संकट निवळले
नाशिक जिल्ह्यात मराठवाडा, विदर्भात गत आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंता वाढली होती. तसेच नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्ष उत्पादकही चिंतातूर झाले होते. मात्र, वातावरण निवळल्याने शेतकरी संकटातून वाचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आज पासून किमान तापमानात घसरण होणार असल्याने थंडीचा कडाका राज्यात वाढणार आहे. यामध्ये विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्र मधील नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात थंडी अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.