आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजारांच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर निरोगी आरोग्यासाठी निसर्गोपचार आणि योगसाधनेकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ यांनी केले. पेठरोडवरील नामको परिचारिका महाविद्यालयाच्या प्रांगणात ए.एन.एम. अभ्यासक्रमाचा १४ वा आणि जी.एन.एम. अभ्यासक्रमाचा ११ वा दीप प्रज्वलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्लास्टिक सर्जन डॉ. राजेंद्र नेहते, संस्थेचे सचिव शशिकांत पारख यांच्यासह नामको हॉस्पिटलच्या मेट्रन समीक्षा काशीद, झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या मेट्रन जयश्री वैशंपायन, इंदिरा गांधी हॉस्पिटलच्या मेट्रन रोहिणी जोशी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. निकुंभ म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अत्याधुनिक उपचारपद्धती आणि प्रभावी औषधांमुळे निदान झालेल्या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. मात्र, आजार होऊच नयेत यादृष्टीनेही जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर विचारमंथन सुरू आहे. यात रासायनिक घटक टाळून अधिकाधिक नैसर्गिक आहारपद्धतीचा स्विकार याचा विचार हाेत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा तेलधुणे, प्रा. प्रीती देवरुखकर यांनी केले. प्रा. एकता शिंदे यांनी आभार मानले. यावेळी विश्वस्त चंद्रकांत पारख, , हॉस्पिटलचे सीईओ डॉ. लक्ष्मीकांत पाठक, वैद्यकीय अधिक्षीका डॉ. विशाखा जहागिरदार यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.