आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा रागयड परिसर दुमदुमला. सोहळा पाहण्यासाठी रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी झाली. यंदा ‘शिवराय मनामनात-शिवराज्याभिषेक घराघरांत’या संकल्पनेनूसार रायगडावर हा सोहळा साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. आज शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, मी राज सदरेवर राजकीय भाष्य करणार नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पद्धतीमुळे पध्दतीमुळे लोकसंचय वाढला. शिवाजी महाराजांच्या अखंड ध्यासामुळे सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे 'स्वराज्य' उदयास आले आणि महाराज छत्रपती झाले, असे सांगत उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आधी ध्वजपूजन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करू राज्याभिषेक सोहळा पार पडला.
रायगडावर आकर्षक रोषणाई
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी अंधार पडताच किल्ले रायगड या रोषणाईने उजळून निघणार आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले आहे. भवानी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.